Breaking News
रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम; जगभर महागाईचा झेंडा उंच
नवी दिल्ली ः रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे पुरवठा साखळी प्रभावीत झाली आहे. खाद्यपदार्थांच्या पुरवठ्यामध्ये अडथळा निर्माण होताना दिसत आहे. मात्र हे सर्व वातावरण भारतीय शेतकरी आणि निर्यातदारांच्या पथ्यावर पडणारं आहे. केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार चालू वर्षात साखरेची विक्रमी निर्यात झाली आहे. त्याच प्रमाणात गव्हाचीदेखील निर्यात वाढली असल्याचं खाद्य सचिव सुधांशु पांडे यांनी म्हटले आहे. दरम्यान, या युद्धामुळे अन्नधान्याच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai