Breaking News
पाकच्या कुरापतींना सडेतोड उत्तर ; सिंदुर भडकले हल्ले परतवले
पहलगाम मध्ये केलेल्या दहशतवादी हल्याला उत्तर म्हणून भारतीय सेनेने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त करून ऑपरेशन सिंदूर ही मोहीम फत्ते केली. या हल्ल्याने पाक चांगलाच भेदरला आहे मात्र त्याने आपल्या कुरापती सुरुच ठेवल्या आहेत. सिंदूर सुरू केल्यानंतर काही तासांतच सीमेपलीकडून गोळीबार झाला. भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरुवार रात्रीपासून जोरदार धुमश्चक्री सुरु आहे. पाकिस्तानी सैन्याने भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मारा करुन हवाई हल्ला केला होता. मात्र, भारतीय लष्कराने हे सर्व हल्ले परतवून लावत पाकिस्तानमध्ये घुसून शत्रूला नेस्तनाबूत केले. भारतीय सैन्यदलाने वायूदल, हवाईदल आणि पायदळ या तिन्ही आघाड्यांवर पाकिस्तानला धूळ चारली आहे. त्यामुळे सीमेवर युद्धाची गडद सावली असल्याची चित्र निर्माण झाले आहे.
मुख्यमंत्र्यांनी कोणते निर्देश दिले?
ऑपरेशन सिंदूरची वैशिष्ट्ये-
1. पाकिस्तानच्या रडार यंत्रणेला कळू न देता हल्ला
2. भारतानं दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केल्याची पाकची कबुली
3. पाकव्याप्तच नव्हे पाकिस्तानातले अड्डेही उद्धवस्त
4. दहशतवादी अड्ड्यांची माहिती अचूक होती हे सिद्ध
5. 9 तळांवरील हल्ल्यात शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा
6. भारतीय हवाई हल्ल्यांत एकाही नागरिकाला इजासुद्धा नाही
7. आंतरराष्ट्रीय सीमा रेषा ओलांडून भारताचे हल्ले
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai