Breaking News
आठ जणांची ओळख पटली ; मृतांच्या कुटुंबीयांसाठी मदत जाहीर
मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यात झालेल्या एसटी बस अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. त्यातील आठ मृतांची ओळख पटवण्यास प्रशासनाला यश आले आहे. या अपघातात एसटीचे चालक आणि वाहक या दोघांचाही मृ्त्यू झाला आहे. त्याशिवाय 11 प्रवाशांना प्राण गमवावे लागले आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. महाराष्ट्र सरकारचे अधिकारी मध्य प्रदेशातील प्रशासनाच्या संपर्कात आहेत.
मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये आज सकाळी एसटी महामंडळाची बस कोसळून झालेल्या अपघाताबद्धल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं असून असून बचाव कार्य व्यवस्थित पार पाडावं आणि जखमींवर लगेच उपचारासाठी मध्य प्रदेश मधील जिल्हा प्रशासनाशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश जळगाव जिल्हाधिकार्यांना दिले आहेत. अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्याशी देखील बोलून मध्यप्रदेश मधील खरगोन व धार जिल्हा प्रशासनाला अपघातग्रस्त व्यक्तींना आवश्यक ते सहकार्य करण्याचे नियोजन करण्याची विनंती केली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai