Breaking News
मुंबई ः गृहकर्ज महाग होत असूनही आणि मालमत्तेच्या किमती वाढत असूनही, देशातल्या पहिल्या सात शहरांमध्ये गृहनिर्माण युनिटची विक्री महामारीपूर्वीची पातळी ओलांडण्याची शक्यता असल्याचा अंदाज उद्योगक्षेत्रातल्या दिग्गजांनी व्यक्त केला आहे. नोटाबंदी, रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी’ (रेरा), जीएसटीची अंमलबजावणी आणि कोरोना यासारख्या सलग चार अडथळ्यांनंतर गेल्या सहा वर्षांमध्ये देशातली निवासी बाजारपेठ अनेक संरचनात्मक बदलांमधून जात असल्याचं उद्योग तज्ज्ञांचं मत आहे.
घर खरेदीदारांची सर्वोच्च संस्था असलेल्या रिअल इस्टेट (नियमन आणि विकास) कायदा, 2016 अंतर्गत स्थापन केलेल्या रेरा प्राधिकरणाला घरखरेदीची प्रक्रिया सूकर करण्याचं श्रेय जातं. सर्व प्रमुख सूचीबद्ध रिअल इस्टेट विकासकांनी गेल्या आर्थिक वर्षात (2021-22) विक्रमी विक्री केली. चालू आर्थिक वर्षात (2022-23) त्यांच्या विक्रीच्या संख्येत आणखी सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. तथापि, या वर्षी रिझर्व्ह बँकेने पॉलिसी रेपो रेटमध्ये एकूण 1.40 टक्क्यांची वाढ केल्याने आणि बँकांनी गृहकर्ज घेणार्यांवर बोजा टाकल्याने घरांच्या विक्रीचा वेग मंदावला आहे. याशिवाय, गेल्या एका वर्षात नोंदवलेल्या घरांच्या किमतींमध्ये झालेल्या उच्चांकी वाढीमुळेही अनेकांना त्यांच्या घरखरेदीची योजना पुढे ढकलणं भाग पडलं आहे. बांधकाम, विशेषत: सिमेंट आणि स्टीलच्या जादा खर्चामुळे जून तिमाहीत किंमती वार्षिक आधारावर सरासरी पाच टक्क्यांनी वाढल्या आहेत; परंतु विकासक आणि दलालांचा विश्वास आहे की खर्चात झालेली वाढ अल्पकालीन आहे आणि सणासुदीपासून मागणी पुन्हा एकदा वाढेल.
मालमत्ता सल्लागार फर्म ऍनारॉक’ने सांगितलं की, या वर्षी देशातल्या सात प्रमुख शहरांमध्ये, दिल्ली-एनसीआर, मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर), चेन्नई, कोलकाता, बंगळूर, हैदराबाद आणि पुणे येथे निवासी युनिट्सच्या विक्रीने प्री-कोविड पातळी म्हणजेच 2019 मधली स्थिती गाठली. म्हणजेच यंदा या शहरांमध्ये दोन लाख 61 हजार 358 पेक्षा अधिक युनिट्सची विक्री होईल. तथापि, तरीही विक्री 2014 मधल्या 3.43 लाख युनिट्सपेक्षा कमी असेल. अनारॉक’चे अध्यक्ष अनुज पुरी म्हणाले की, रेपो दरात वाढ झाल्यामुळे एप्रिल-जून तिमाहीत घरांच्या विक्रीवर परिणाम झाला आहे. मॅक्रोटेक डेव्हलपर्स’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक लोढा म्हणाले की भारताचा गृहनिर्माण उद्योग संरचनात्मक उन्नतीच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. घरांच्या किमतींमध्ये माफक वाढ बाजारासाठी चांगली आहे. आकडेवारीवरून दिसून येतं की, गृहकर्जावरील व्याजदर खाली येत असून घरांच्या मागणीवर कोणताही परिणाम झालेला नाही.
गोदरेज प्रॉपर्टीजचे कार्यकारी अध्यक्ष पिरोजशा गोदरेज यांनी सांगितलं की गेल्या दोन वर्षांमध्ये बाजाराने सर्वोत्तम अर्थव्यवस्था पाहिली आहे, कारण कर्जाचे व्याजदर 6.5 ते सात टक्क्यांपर्यंत खाली आले आहेत. या काळात गेल्या सात-आठ वर्षांपासून मालमत्तेच्या किमतीही कमी-अधिक प्रमाणात स्थिर होत्या. ते म्हणाले की, व्याजदरात वाढ आणि घरांच्या किमतीत वाढ होऊनही अर्थव्यवस्थेची पातळी अजूनही आकर्षक आहे. गृह खरेदीदारांची सर्वोच्च संस्था असलेल्या एफपीसीई’चे अध्यक्ष अभय उपाध्याय म्हणाले की, दशकाहून अधिक काळापासून सुरू असलेली ही मागणी आता प्रत्यक्ष व्यवहारात बदलत आहे. बांधकाम व्यावसायिकांनी सदनिका वेळेवर देण्याच्या आश्वासनांची पूर्तता केल्यास घरांच्या विक्रीचा वेग कायम राहू शकेल.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai