
द्रोणागिरी डोंगराचे उत्खनन बंद करा
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 11, 2023
- 486
आपची प्रशासनाकडे मागणी प तहसीलदारांना दिले निवेदन
उरण ः ऐतिहासिक दृष्टीने महत्वाच्या असलेल्या द्रोणागिरी पर्वताचे मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरु असून यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. शिवाय माती ने आण करणाऱ्या डंपरमुळे उरण मधील रस्त्यावर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धन व्हावे या दृष्टीकोनातून मातीचे उत्खनन बंद करावे अशी मागणी पत्रव्यवहाराद्वारे आम आदमी पार्टीने प्रशासनाकडे केली आहे. याबाबत उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांना निवेदन देण्यात आले.
ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचा असलेल्या व निसर्ग सौंदर्यात, पर्यटनात भर घालणाऱ्या द्रोणागिरी किल्ल्याचे अस्तित्व आता धोक्यात आले असून या डोंगर पायथ्याशी व डोंगर परिसरातील गावाजवळ मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरु आहे. या उत्खननामूळे ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा लाभलेल्या उरण तालुक्यातील द्रोणागिरी किल्ल्याचे अस्तित्व धोक्यात आल्याने विविध सामाजिक संस्था, पर्यावरण प्रेमी, निसर्गप्रेमी तसेच ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. सदर उत्खनन थांबावे यासाठी गेली अनेक वर्षे राज्य शासनाच्या विविध विभागात विविध सामाजिक संस्था, संघटनांनी पाठपुरावा, पत्रव्यवहार केला आहे. मात्र या गोष्टीकडे प्रशासनाने नेहमी दुर्लक्ष केल्याने उरण तालुक्यातील द्रोणागिरी डोंगर व आजू बाजूच्या परिसराचे पर्यावरणाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. निसर्ग वाचावा, डोंगर वाचावे, द्रोणागिरी किल्ल्याचे अस्तित्व वाचावे यासाठी आम आदमी पक्ष उरण तालुक्याच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. मातीचे उत्खनन बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदन देताना आम आदमी पार्टीचे उरण विधानसभा संघाचे अध्यक्ष संतोष भगत, उरण महिला तालुका उपाध्यक्ष स्नेहश्री मोहसीन मेनन,सुनिल सूर्यवंशी,मनोज शशिकांत घुमरे,सुधीर पाटील, भाटकर यांच्यासह अनेक आम आदमी पार्टी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai