Breaking News
21 फेब्रुवारीपासून होणार नियमीत सुनावणी
मुंबई ः महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील पडदा लवकरच उठण्याचे संकेत शुक्रवारी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाले आहेत. विद्यमान खंडपीठाने हा खटला सात न्यायमुर्तींच्या खंडपीठाकडे सुनावणीसाठी न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर 21 तारखेपासून खटल्याची नियमीत सुनावणी घेण्याचे सुतोवाच केल्याने राज्यातील सत्तासंघर्ष आता अंतिम टप्प्यात पोहचल्याचे निश्चित झाले आहे. याबाबत अंतिम निर्णय येत्या काही दिवसात येईल ही अपेक्षा अनेक विधीतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
राज्यात गेल्या सहा महिन्यांपासून सुरु असलेला सत्तासंघर्ष लवकर संपण्याची चिन्हे दिसत नसताना आणि शुक्रवारी झालेल्या सुनावणीत हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे जाणार अशी अपेक्षा करणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने धक्का दिला आहे. न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी आपल्याच खंडपीठाकडे होणार असल्याचे सांगत 21 फेब्रुवारीपासून नियमीत सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे. 20 जुनपासून सुरु झालेला हा सत्तासंघर्षाचा प्रवास आता अंतिम टप्प्यात आल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. शुक्रवारच्या सुनावणीत नबाम रेबिया या खटल्याचे मुद्दे व महाराष्ट्रातील सत्तासंघर्षातील मुद्दे वेगळे असल्याने तुर्तास सदर प्रकरण वरिष्ठ खंडपीठाकडे देण्याची गरज नसल्याचे न्यायालयाने नमुद केले आहे.
न्यायालयाच्या या निर्णयानंतर महाराष्ट्रातील अनेक राजकर्त्यांनी याबाबत निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. राज्यातील सत्तासंघर्षाबाबत न्यायालयाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी भुमिका जनतेची असल्याने न्यायालयावरील दबाव वाढल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे 21 तारखेपासून सर्वोच्च न्यायालयात सुरु होणाऱ्या या खटल्याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai