Breaking News
सरन्यायाधीशांचे खडे बोल
मुंबई ः तीन वर्षांचा संसार एका रात्रीत मोडला कसा? असा सवाल सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी विचारला. महाधिवक्ते तुषार मेहता राज्यपालांच्या बाजूने युक्तिवाद करत असताना सरन्यायाधीशांनी महत्त्वाची निरीक्षणं नोंदवली. राज्यपालांनी सरकार पाडण्यात मदत करायला नको होती, राज्यपालांनी आपल्या मर्यादेत राहायला हवं होतं असं सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी बुधवारच्या सुनावणीत म्हटले.
सध्या ही सुनावणी अंतिम टप्प्यावर असून याप्रकरणी लवकरच निकाल लागण्याची शक्यता आहे. अशातच सरन्यायाधीशांनी आजच्या सुनावणीत अत्यंत महत्वपूर्ण टिपण्णी केली. त्यामुळे शिंदे गट अडचणीत येणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्या युक्तिवादाने आजच्या सुनावणीची सुरुवात झाली. तत्कालीन राज्यपाल कोश्यारी यांची बाजू मेहता यांनी मांडली. त्यावर टिप्पणी करताना सरन्यायाधीशांनी महत्त्वाची टिप्पणी केली. तीन वर्ष एकत्र सत्तेत होते, मात्र तीन वर्षाचा सुखी संसार एका रात्रीत मोडला का? असा सवाल सरन्यायाधीशांनी उपस्थित केला. तसंच, बंड फक्त एकाच पक्षात झाले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे 97 आमदार उद्धव ठाकरेंच्या बाजूने होते. राज्यपालांकडून याचा विचार झाला नसल्याचे दिसते, अशी टिप्पणीही त्यांनी केली. शिवसेनेच्या विधीमंडळ पक्षाने एकनाथ शिंदे यांची विधीमंडळ पक्ष नेता म्हणून निवड केली होती. म्हणूनच राज्यपालांनी त्यांना सरकार स्थापनेसाठी बोलावले. जेव्हा अजय चौधरींची नेमणूक झाल्याचे जाहीर करण्यात आली तेव्हा त्या गटाकडे आवश्यक आमदारांचा आकडाही नव्हता, असेही सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai