Breaking News
या आठवड्यात राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला. मान्सुनचे आगमनही मेघगर्जनेच्या धुमधडाक्याने झाले. मे महिन्याच्या अखेरीस जोरदार मेघ बसरल्याने धरणातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. काह धरणे पहिल्यांदाच मे महिन्यात पुर्ण क्षमतेने भरली आहेत. महाराष्ट्रातील अनेक लहान मोठ्या धरणांची हीच परिस्थिती बघायला मिळत आहे. उरणचे रानसई, पनवेलचे देहरंग, नवी मुंबईचे मोरबे या तीनही धरणातील पाणीसाठी वाढल्याने पनवेल, नवी मुंबई व उरणकरांना दिलासा मिळाला आहे.
रानसईच्या पाणी पातळीत वाढ
उरण : सोमवार पासून उरणच्या रानसई धरण परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. 116 फूट उंचीच्या धरणात मे महिन्यात अवघे 90 फुटांवर पाणी होते. पावसाने ही पातळी गुरुवारी 96.6 वर आणली आहे. मात्र त्यानंतरही एमआयडीसीकडून करण्यात आलेली मंगळवार व शुक्रवार या दोन दिवसांची पाणीकपात कायम आहे. त्यामुळे या पावसाने येथील नागरिकांना दिलासा मिळालेला नाही.
उन्हाळ्यात रानसई धरणातील पाणीसाठा कमी होऊ लागला होता. धरणात जूनअखेरपर्यंत पुरवठा करता येईल इतकाच पाणी साठा उपलब्ध आहे. रानसई धरणातील पाणी साठवणूक क्षमता वाढत नसल्याने उरणच्या नागरिकांवर पाणीकपातीचे संकट वाढू लागले आहे. रानसई धरणाची पाणी साठवणूक क्षमता कमी झाली असल्याने धरणातून पावसाळ्यातील साडेतीन महिन्याचे लाखो लीटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे येथील नागरिकांना ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यापासूनच वर्षोनुवर्षे पाणीकपातीचा सामना करावा लागत आहे. धरणाची पाणी क्षमता वाढविण्यासाठी एमआयडीसीने तयार केलेला प्रस्ताव अनेकवर्षे धूळखात बसला आहे.
उरण तालुक्यातील नागरिकांना व येथील उद्योगासाठी लागणारे पाणी एमआयडीसीच्या रानसई धरणातून पुरविले जात असून उरणकराइना दररोज 41 दश लक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. मात्र एमआयडीसीकडे केवळ 30 दश लक्ष लिटर पाणीच असल्याने दररोज 10 दश लक्ष लिटर पाणी कमी पडत असल्याने हा पाणी पुरवठा जून महिन्यापर्यंत करता यावा यासाठी पाणीकपात केली जात आहे.
रानसई धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. मात्र एमआयडीसीकडून सुरू असलेली पाणी कपात रद्द करण्याचा विचार सुरू आहे. मात्र पावसाचा अंदाज पाहून या संदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल असे उरण एमआयडीसीतील अधिकाऱ्यांनी सांगितले.
देहरंग धरणातील पाणी जून महिन्यापर्यंत पनवेल शहरासाठी घेता यावे यासाठी महापालिका प्रशासनाने मार्च महिन्यापासून दिवसाला 4 ते 5 दश लक्ष लीटर पाणी घेण्याचे नियोजन केले. पाण्याच्या नियोजनामुळे मार्च महिन्यापासून पाणी कपात लागू केल्यामुळे एमजेपीकडून वाढीव पाणी पुरवठा पनवेल शहराला केला जात होता. सोमवारी मुसळधार धरण क्षेत्रात कोसळल्यामुळे हा पाऊस पनवेलकरांसाठी आनंदवार्ता घेऊन येणारा ठरला.
सोमवारी पडलेल्या पावसामुळे पनवेलकरांची पाणी टंचाई दूर झाली. सोमवारपासून पाणी कपात पालिकेने रद्द केली आहे. नागरिकांनी पालिकेचे आभार मानले आणि टंचाईच्या काळात नागरिकांचे सहकार्य महापालिका प्रशासनाला लाभल्याने त्यांचेही आभार पालिका मानते. विलास चव्हाण, उप अभियंता, पाणी पुरवठा विभाग, पनवेल महापालिका
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai