Breaking News
नवी मुंबई ः मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, समृद्धी महामार्ग आणि शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूवर प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांना संपूर्ण टोलमाफी देण्यात आली आहे. पुढील 5 वर्षांसाठी ही टोलमाफी असल्याचे शासनाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) अधिकार क्षेत्रातील सर्व राज्य महामार्गांवरील इलेक्ट्रिक वाहनांना (ईव्ही) लवकरच टोल माफ करण्याचे आश्वासनही या जीआरमध्ये देण्यात आले आहे.
इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्याचे धोरण राज्य सरकारने आणले आहे. मंत्रिमंडळ बैठकीत या धोरणाला 29 एप्रिल रोजीच मंजुरी देण्यात आली. परंतु, या धोरणाबाबत शासननिर्णय जारी करण्यात आला नव्हता. आता 24 दिवसांनी हा आदेश काढण्यात आला आहे. राज्य महामार्गांवर हळूहळू टोल सवलत देण्याचा निर्णय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील सुकाणू समिती घेईल. टोल सवलत म्हणून माफ केलेली रक्कम परिवहन विभागाकडून पूरक तरतुदींद्वारे पीडब्ल्यूडीला परतफेड केली जाईल, असे जीआरमध्ये म्हटले आहे. दि. 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2030 पर्यंत ही टोलमाफी असणार ओह.
इलेक्ट्रिक वाहनांना अनुदान
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai