Breaking News
उरण-ते सीएसएमटी सेवा सुरु करण्याचीही मागणी
उरण : अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर उरण-नेरुळ तसेच उरण-बेलापूर लोकल सेवा 12 जानेवारी 2024 रोजी सुरू झाली. त्यामुळे उरणकरांचा पनवेल नवी मुंबई ते मुंबई प्रवास जलद होईल अशी अपेक्षा होती. मात्र लोकल फेऱ्यांची संख्या कमी असल्याने उरणकरांची परवड होत आहे. त्यात रस्ते मार्गावरही अवजड वाहनांची गद असल्याने तसेच बस, रिक्षा यांचीही संख्या मर्यादेत असल्याने उरणकरांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे लोकल फेऱ्या वाढवून उरण-सीएसएमटी लोकस सुरु करावी अशी मागणी प्रवासीवर्गाने केली आहे. तसेच वारंवार मागणी व पाठपुरावा करुनही प्रशासनाने दखल न घेतल्याने प्रवासी वर्गाने आंदोलनाचे हत्यार उपसण्याचा इशारा दिला आहे.
उरणचा औद्योगिक विकास झाल्याने नोकरवर्ग, विद्याथ, व्यावसायिकांची संख्या वाढली आहे. नवीन गृहप्रकल्प उभे राहिल्याने प्रवाशांची संख्याही वाढली आहे. सोयीस्कर असणारा रेल्वे प्रवास असावा म्हणून उरणकरांच्या मागणी व पाठपुराव्यामुळे सन 2024 पासून नेरुळ-उरण, बेलापुर-उरण रेल्वे सेवा सुरु झाली. मात्र लोकल फेऱ्यांची संख्या फारच कमी असल्याने नाईलाजास्तव सार्वजनिक किंवा खाजगी वाहतुकीचा वापर करावा लागत आहे. त्यातही रस्ते मार्गावर अवजड वाहनांची संख्या जास्त असल्याने जीव मुठीत घेऊन हा प्रवास करावा लागतो. सिडकोचे अनेक गृहप्रकल्प उरण, बामन डोंगरी, खारकोपर रेल्वे स्थानकालगत असल्याने येथे प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र तासाभराने एखादी लोकल येत असल्याने प्रवासी हवालदिल झाले आहेत. गतवष जुलै 2024 मध्ये प्रवासी संघटनेने रेल्वेमंत्र्यांना पत्र देऊन उरण ते सीएसएमटी लोकल सुरु करण्याची मागणीही केली होती. मात्र त्यावर प्रशासनाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.
लोकलची वेळही सकाळी पाच वाजल्यापासून किंवा रात्री उशिरा साडेदहा नंतर नसल्यामुळे कामगार वर्गासाठी खूप गैरसोयीचे होत आहे. बसची संख्याही मर्यादीत असल्याने तिथेही झुंबड असते. नाईलाजास्तव जास्तीते पैसे देऊन रिक्षा किंवा खाजगी बसने प्रवास करावा लागतो. अथक प्रयासाने लोकल सेवा चालू झाली आहे खरी परंतु अफाट गदमुळे सर्वसामान्य नोकरदार वर्ग, महिला वर्ग आपला बहुमूल्य वेळ या लोकल प्रवासामध्ये घालवत आहे. त्यामुळे लोकलच्या फेऱ्या एक तासाऐवजी प्रत्येक पंधरा मिनिटाला असावी, तसेच उरण सीएसटी लोकल उरण ठाणे लोकल ताबडतोब चालू करण्यात यावी व बेलापूर ते उरण रस्त्यावरील मालवाहतूक हा सगळा जीवघेणा प्रवास टाळण्यासाठी हजारो प्रवासांच्या हितासाठी सरकारने व रेल्वे बोर्डाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा ही मागणी प्रवाशांना संघटित करून प्रवाशांच्या वतीने डॉक्टर नितीन दिघे यांनी केली आहे. लोकलची संख्या व वेळापत्रकामध्ये बदल करण्याची मागणी सर्व प्रवासी वर्गाकडून होत आहे. सकाळी 5 वाजता पहिली लोकल व रात्री साडेबारा वा. शेवटची लोकल असल्यास नोकरदार वर्गाला दिलासा मिळेल.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai