Breaking News
22 मार्चला जनता कर्फ्यू ः पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन
नवी दिल्ली : जगभरात हातपाय पसरवणार्या कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी देशात 22 मार्चला जनता कर्फ्यू करण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. जनतेने जनतेसाठी लावलेला हा कर्फ्यू असेल. सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत हा जनता कर्फ्यू असणार आहे. याचे जनतेने पालन करावे. या दरम्यान कोणीही घराबाहेर जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.
कोरोनाचे संकट हे एखादे राज्य किंवा देशापुरते मर्यादित नाही. पहिल्या आणि दुसर्या महायुद्धाच्यावेळीही जगातील सर्व देशांना झळ पोहोचली नव्हती. मात्र, कोरोनाच्या रुपाने यावेळी संपूर्ण मानवजातीसमोरच संकट उभे ठाकले आहे. आतापर्यंत भारताने या संकटाचा निर्धाराने सामना केला. मात्र, गेल्या काही दिवसांपासून देशात आपण कोरोनाच्या संकटापासून वाचलोय किंवा आपल्याकडे सर्वकाही ठीक आहे, असे वातावरण नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे. परंतु, आपण कोरोनाच्याबाबतीत अशाप्रकारे निश्चिंत राहणे कदापि परवडण्यासारखे नाही. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने सजग आणि सावध राहिले पाहिजे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, जनता कर्फ्यूची मागणी मी आज देशवासीयांकडे करतो आहे. जनता कर्फ्यू म्हणजे स्वतःच्या सुरक्षेसाठी स्वतःने स्वतःवर घातलेले निर्बंध त्याचे पालन प्रत्येक नागरिकाने करावे अशी मागणी मी करतो आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आलं आहे असंही मोदींनी स्पष्ट केलं आहे. देशातील सर्व राज्य सरकारांनीही हा आदेश पाळावा असंही मोदींनी म्हटले आहे.
आपल्या देशावर आलेलं हे संकट साधंसुधं नाही असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. प्रत्येकाने संयम ठेवला पाहिजे आणि संकल्प केला पाहिजे की केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्देशांचं पालन करु, असं ते म्हणाले. ते म्हणाले की, मागच्या दोन महिन्यांपासून आपण कोरोनाबाबत विविध बातम्या ऐकतो आहोत आणि पाहतो आहोत. भारतीयांनी कोरोनाचा प्रभावीपणे सामना केला याचं मला कौतुक आहे असंही मोदींनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून असं वातावरण तयार झालं की आपण संकटापासून आपण सध्या वाचलो आहोत. सगळं काही ठीक आहे मात्र जागतिक महामारी असलेल्या कोरोनामुळे निश्चिंत होण्याची ही वेळ नाही. प्रत्येक भारतीयाने सजग राहणं आवश्यक आहे असंही मोदींनी म्हटलं आहे.
मोदींच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे
कोरोनाचा सामना करण्यासाठी संयम ठेवणं महत्त्वाचं आहे
गर्दीपासून साावध रहा, घराच्या बाहेर निघू नका. शक्य तेवढी कामं घरातून करण्याचा प्रयत्न करा
सरकारी कर्मचारी, रुग्णालयं आणि पत्रकारांना काम करणं महत्त्वाचं आहे. पण इतरांनी स्वत:ला आयसोलेटेड करणं महत्त्वाचं आहे
वयोवृद्धांनी पुढचे काही दिवस घराच्या बाहेर पाऊल टाकू नका
22 मार्चला संचारबंदी लागू करण्यात येईल, त्याचं सगळेजण पालन करूया
रविवारी आपण आपल्या दरवाजासमोर उभं राहून संध्याकाळी 5 वाजता अशा लोकांचे आभार व्यक्त करा ज्यांनी आपल्या सुरक्षेची जबाबदारी घेतली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai