Breaking News
मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरावस्थेवरुन राज ठाकरे यांचे आवाहन
पनवेल ः दीड दशकांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या मुद्यांवरून पनवेलमध्ये बुधवारी निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रस्ता बनवला की तो सहा महिन्यात खराब झालाच पाहिजे कारण पुन्हा रस्ते दुरुस्तीसाठी नवीन टेंडर नवीन काम नवीन टक्के हे चक्र सदैव सुरूच राहणार असल्याची टिका राज ठाकरे यांनी निर्धार मेळाव्यात केली. तसेच यावेळी ठाकरे यांनी आंदोलनाची हाक दिली असून असे आंदोलन करा की त्याची दहशत सरकारला बसली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.
राज ठाकरेंनी बुधवारी पनवेलमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांसाठी निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनसेचे प्रमुख राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील रस्त्यांच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली होती. भारताचं यान चंद्रावर जातंय, पण रस्ते चांगले मिळत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली. महाराष्ट्रातील रस्त्यांच्या झालेल्या दुराव्यस्थेवर त्यांनी भाष्य केलं. मुंबई गोवा महामार्गावर आजपर्यंत 2500 लोकं मृत्यूमुखी पडलेत. अनेकांना दुखणी लागली आहेत, गाड्यांचं नुकसान झालं आहे. तरीही त्याच लोकांना निवडून देत आहेत. त्यामुळे हे पुन्हा पुन्हा निवडून येणारे निवांत आहेत. ते टेंडर, टक्केवारीत व्यस्त आहेत, असा आरोप राज ठाकरे यांनी केला.
मुंबई-गोवा या रस्त्यावर आतापर्यंत 15 हजार 566 कोटी रुपये खर्च झाला आहेत. रस्ता नाही झाला बाकीच्यांच्या तुंबड्या भरल्या. गडकरी यांच्याशी बोललो तर ते म्हणाले कंत्राटदार पळून गेले, काही कोर्टात गेले. यामागे काही कारण तर नाही ना.. कुणाचं काम तर नाही ना अशी शंका त्यांनी उपस्थित केली. कोकणातील जमिनी इतरांच्या घश्यात चालल्या आहेत. नाणार प्रकल्प रद्द होतोय म्हटल्यावर लगेच बारसू प्रकल्प आला. इथे कोणी जमिनी घेतल्या, कोणाच्या नावावर पाच हजार एकर जमीन घेतली. आपलीच लोक आहेत.. कुंपण शेत खातंय आपल्या कोकणी लोकांना फसवून दुसऱ्याच्या घशात घालतात, असेही राज ठाकरे यांनी म्हटले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai