हापूसच्या नावाने कर्नाटकी आंबा विकल्यास कारवाई
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 30, 2024
- 430
नवी मुंबई ः कोकणचा राजा म्हणून ओळख असलेला हापूस आंबा बाजारात दाखल झाला. तसेच हापूसच्या नावाखाली इतर आंबे मिसळून ग्राहकांची फसवणूक करण्याचे प्रकारही वाढताना दिसत आहेत. देवगड, रत्नागिरी भागातून 50 हजार पेट्यांची आवक मुंबईतील कृषीउत्पन्न बाजार समितीत (एपीएमसी) झाली आहे. त्याशिवाय कर्नाटक, केरळ, काहीप्रमाणात उत्तर भारतातूनही आंबा बाजारात आला आहे. आंब्याच्या मोसमात कोकणातील हापूस आंब्याला विशेष मागणी असताना काही व्यापाऱ्यांकडून मात्र ग्राहकांची फसवणूक होताना पहायला मिळते आहे.
गेल्या आठवड्यात एका व्यापाऱ्याकडून अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांची हापूस आंबा म्हणून कर्नाटक आंबा विक्री केल्याची घटना उघडकीस आल्यामुळे हापूस आंब्याच्या विक्रीत भेसळ होत असल्याचा प्रकार अधिक अधोरेखित झाला. त्या अधिकाऱ्याने एपीएमसीत या बाबत सूचना दिल्यानंतर एपीएमसी प्रशासनाला जाग आल्याचे दिसून येत आहे. ग्राहकांच्या हापूस आंब्या संदर्भात वाढत्या तक्रारी पाहून एपीएमसी प्रशासनाने एक परिपत्रक काढून त्या परिपत्रकात हापूस आंबा म्हणून कर्नाटक किंवा अन्य आंबा विकणाऱ्या आणि ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असे नमूद केले आहे. पत्रकात म्हटल्याप्रमाणे फळ बाजार आवारातील व्यापाऱ्यांकडे येत असलेल्या आंबा हा त्या त्या राज्याच्या नावासह आणि आंब्याच्या जाती सह विक्री न करता तो महाराष्ट्रीयन हापूस नावाने बाजार आवारात विक्री होऊन ग्राहकांची फसवणूक करत असतात. फळ बाजार आवारात मोठ्या प्रमाणात आवक होत असलेला आंबा हा ज्या राज्यातून आला आहे.
ज्या नावाने त्याची आवक होईल त्याच नावाने त्याची विक्री करा व त्या आंब्यावर तसे लेबल लावा. तसेच आंबा पिकविण्यासाठी घातक औषधांचा वापर केल्याचे या कार्यालयाच्या निदर्शनास आल्यास अगर याबाबतची तक्रार प्राप्त झाल्यास संबंधितांवर बाजार समितीच्या कायद्याच्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल असे म्हटले आहे.
एपीएमसीतील फळ बाजारात जवळपास 60 टक्के व्यापारी हे महाराष्ट्रा बाहेरचे आहेत. आंबा विक्रीच्या हंगामात हे व्यापारी एपीएमसीतील गाळा भाडेतत्त्वावर घेऊन व्यापार करत असतात. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत आंब्यांची अदला बदली करण्याचे प्रकार काही व्यापाऱ्यांकडून सुरू असल्याचे निदर्शनास आल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. इतर राज्यातून येणाऱ्या आंब्याचे वेष्टण काढून हा आंबा रत्नागिरी, देवगड आंब्याच्या पेट्यांमध्ये भरला जातो. बाजारातील जवळपास 50 टक्के व्यापारी असले प्रकार करत असतात. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होत असल्याने ग्राहक देखील चिंतेत आहेत. बाजार आवारात असले प्रकार घडत असल्याचे आढळून आल्यास आंबा बाजार समितीकडून जप्त करून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच अडत्याची परवानगी निलंबित किंवा रद्द करण्यात येईल असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळांच्या राजाचे राज्य सुरू झाले आहे. गुरुवारी कोकण व दक्षिणेतून तब्बल 1,027 टन आंब्याची आवक झाली असून, 68,952 पेट्यांचा समावेश आहे. गुढीपाडव्याच्या मुहुर्तापर्यंत एक लाख पेट्यांचा टप्पा पूर्ण करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये गुरुवारी दिवसभरात 650 वाहनांमधून सर्व प्रकारची 2811 टन फळांची आवक झाली. यामध्ये जवळपास अर्धी आवक फक्त आंब्याची आहे. कोकणातून 55,147 व इतर राज्यांतून 13,805 पेट्यांचा समावेश आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगडमधून हापूसची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली आहे.
- वाहतूक व्यवस्थेत बदल
बाजार समितीमध्ये आंबा घेऊन येणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र गेट उपलब्ध करून देण्यात आले आहे. मध्यरात्रीपासून पहाटे सर्व आंब्याची वाहने मार्केटमध्ये घेऊन येण्याची व्यवस्था केली आहे. कलिंगड व टरबूजच्या वाहनांना दुपारी तीननंतर मार्केटमध्ये प्रवेश दिला जात असून, खाली झालेली वाहने तत्काळ मार्केटबाहेर काढण्यात येत आहेत.
बाजार समितीमध्ये आंब्याची आवक वाढली आहे. कलिंगड व इतर फळांचा हंगामही सुरू आहे. फळांची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्यामुळे वाहतूक व व्यापार सुरळीत होण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. - संगीता अढांगळे, उपसचिव, फळ मार्केट
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai