अतिवृष्टीग्रस्तांसाठी 31 हजार 628 कोटींचे पॅकेज
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 07, 2025
- 129
मुंबई ः राज्यात काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कसती जमीन, राहते घरे, दुकाने सगळेच उद्धवस्त झाले आहे. या शेतकऱ्यांसाठी सरकारने विशेष पॅकेजची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांनी मदत पॅकेज जाहीर केले. यामध्ये अतिवृष्टीग्रस्तांसाठी तब्बल 31 हजार 628 कोटी रुपयांचे मदतीचे पॅकेज जाहीर केले आहे. विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांची जमीन खरवडून गेली आहे त्यांना हेक्टरी 3.47 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे.
राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 253 तालुक्यातील 68 लाख हेक्टर इतक्या जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टी भागात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टी पाहणी दौरा केला, तेव्हापासून मदतीच्या पॅकेजची लवकरच घोषणा होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. त्याच पार्श्वभूमीवर मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी मोठ्या पॅकजेची घोषणा केली. नुकसान झालेल्या सर्वाना सरसकट मदत राज्य सरकारतर्फे करण्यात येणार आहे. शेतकरी, नुकसानग्रस्त घरे, जमिनी आणि जनावरांच्या नुकसानीसाठीही भरीव मदत देण्याचा शासनाचा निर्णय आहे.
ज्यांच्या घरांचे 100 टक्के नुकसान झाले आहे त्यांना पंतप्रधान आवास योजनेतून नवीन घर देण्यात येणार आहे. डोंगरी भागातील घरे, अंशतः नुकसान झालेली घरे, गोठे, गुरांचे नुकसान, मृत व्यक्ती, जखमी अशा सर्व नुकसानग्रस्तांना मदत मिळणार आहे. शेतकरी रब्बीचे पिक घेतोय की नाही हे विचारत न घेता आम्ही 10 हजार रुपयांची मदत करत आहोत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
- जमीन वाहून गेलेल्यांना हेक्टरी 3.47 लाख रुपये
जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 47 हजार रोख नुकसान भरपाई आणि हेक्टरी 3 लाख नरेगाच्या माध्यमातून देण्यात येईल. त्यामुळे, जवळपास हेक्टरी साडेतीन लाख रुपये मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे.
जनावरे आणि घरासाठीही मदतनिधी
- दुधाळ जनावरांना 37 हजार रुपयांपर्यंत मदत
- गाळ भरलेल्या विहिरींसाठी 30 हजार
- कुकुटपालनाला 100 रुपये प्रति कोंबडी
- नष्ट, पडझड झालेली घरं नव्याने बांधण्यासाठी मदत
- डोंगरी भागातील घरांना 10 हजारांची अधिकची मदत
- झोपड्यांची मदत, गोठा, दुकानदार यांना 50 हजार मदत करणार
- विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी करणार
- इम्फ्रास्टक्चरसाठी 10 हजार कोटींची तरतूद
पीक नुकसानभरपाई
- शेतकऱ्यांना रब्बीचे पीक घेता आले पाहिजे यासाठी प्रति हेक्टरी 10 हजार रुपये
- हंगामी बागायती शेतीनुकसान भरपाई - हेक्टरी 27 हजार रुपये
- बागायती शेती नुकसान भरपाई - हेक्टरी 32 हजार रुपये
- विमा व्यतिरिक्त शेतकऱ्यांना हेक्टरी 17 हजार रुपये
- कोरडवाहू शेतकऱ्यांना 35 हजार
- बागायती शेती ज्यांनी विमा उतरवला असेल त्यांना 50 हजारांहून अधिक मदत मिळेल.
- काही राहून गेलं तर समावेश करू - अजित पवार
दोन हेक्टरपर्यंत एनडीआरएफ आणि केंद्राचे नॉर्म्स असतात, त्यावरील भार आम्ही उचलला आहे. बारकाईने विचार करत कोणताही घटक वंचित राहणार नाही असा विचार केलाय. भौगोलिक परिस्थिती वेगळी असते, जर काही राहून गेलं तर त्याचा समावेश करण्याची देखील आमची तयारी आहे, अशी माहिती यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
- ही अंतिम मदत नाही, टोकाचं पाऊल उचलू नये- एकनाथ शिंदे
शेतकऱ्यांसमोरील संकट मोठं होतं, प्रत्यक्ष बांधावर जात आम्ही नुकसान पाहिलं. उभी पिकं आडवी झाली होती, जमिनी कापल्या गेल्या आहेत. पशूधन वाहून गेलं, जिवितहानी झाली आहे, अशा प्रसंगात शेतकऱ्यांना मदत करण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, असं भाष्य आम्ही केलं होतं. अशात मदत करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे, ही अंतिम मदत नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, शासन खंबीरपणे आपल्या पाठीमागे उभे आहे, असेही शिंदेंनी म्हटले. - दिवाळीआधी पैसे देण्याचा प्रयत्न
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पैसा दिवाळी पैसे आधी देता येईल, यासाठी प्रयत्न राहिल. मृत व्यक्तींचे सहाय्य आधीच दिले आहेत. काही गोष्टी ज्या राहिल्या आहेत, त्या दिवाळी आधीच देण्याचा प्रयत्न करणार आहोत. जवळपास 18 हजार कोटींपेक्षा अधिक पैसे क्रॉप कम्पेन्शेसनमधून देतोय. तसेच, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आम्हाला पैसे दिले आहेत, काहींनी सीएसआर देण्याचे मान्य केले आहे. शिक्षणाचा प्रश्न निर्माण होऊ नये ते यातून खर्च करू असा प्रयत्न राहिल, अशी माहितही फडणवीसांनी दिली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai