Breaking News
नवी मुंबई : अग्निसुरक्षेकडे दुर्लक्ष करुन विद्यार्थ्यांची सुरक्षा वार्यावर सोडणार्या 150 शाळांना पालिकेच्या शिक्षण विभागाने नोटीस बजावण्यात आली आहे. नियमित फायर ऑडिट केली जात नसल्याप्रकरणी मनसेने शिक्षण विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार नियम धाब्यावर बसवणार्या शाळांवर कडक कारवाईची मागणी होत आहे.
शाळांमध्ये आगीसारखी दुर्घटना टाळण्यासाठी शाळांना नियमित फायर ऑडिटची सक्ती करण्यात आलेली आहे. यानुसार शाळांमध्ये अग्निशामक यंत्र बसवणे आवश्यक असून, त्याची वर्षातून दोनदा तपासणी करणे बंधनकारक आहे. यानंतरही नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील अनेक शाळांकडून अग्निसुरक्षेची बाब दुर्लक्षित करून विद्यार्थ्यांची सुरक्षा येत होेती. यामुळे भविष्यात अशा शाळांमध्ये आगीची दुर्घटना घडल्यास मोठ्या हानीची शक्यता नाकारता येत नाही. त्यानंतरही प्रशासनाकडूनही अशा शाळांवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात येत नव्हती. यामुळे मनसे विद्यार्थी सेना शहराध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी शिक्षण विभागाकडे अशा शाळांवर कारवाईची मागणी केली होती, त्यानुसार शिक्षण विभागाने 150 शाळांना नोटीस बजावली आहे. त्यांच्याकडून अग्निसुरक्षेत हलगर्जीपणा होत असल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये अनेक नामांकित शाळांचाही समावेश आहे. या शाळांवर प्रशासनाकडून कारवाई करण्याची मागणी उपशहराध्यक्ष संदेश डोंगरे यांनी केली आहे.शाळांमध्ये अग्निशामक यंत्र बसवणे आवश्यक असून, त्याची वर्षातून दोनदा तपासणी करणे बंधनकारक आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai