आरोग्य, शिक्षण आणि पावसाळापूर्व कामांना प्राधान्य द्या
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 07, 2021
- 763
पालिकेच्या निधीचे विनियोग करण्याची आमदार गणेश नाईक यांची सुचना
नवी मुंबई ः कोरोना महामारीच्या बिकट परिस्थितीत उपलब्ध निधीचा विनियोग आरोग्य सुविधा, शिक्षण आणि पावसाळापूर्व कामांवर प्राधान्याने खर्च करावा, अशी सुचना आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबई पालिका प्रशासनाला केली आहे.
आ. नाईक यांची कोरोना प्रतिबंधात्मक आढावा बैठक मंगळवारी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्यासोबत बेलापूर येथील पालिका मुख्यालयात सकाळी पार पडली. कोरोनाच्या दुसर्या लाटेत नवी मुंबई पालिका हददीत रूग्णांची दैनंदिन संख्या 1500 पर्यंत जावून पोहोचली आहे. कोरोना नियंत्रणाबाबत त्यांनी पालिकेला मौलिक सुचना केल्या. कोरोनाच्या पहिल्या लाटेत सरासरी 500 ते 600 पर्यंत राहत असलेली नवी मुंबईतील रूग्णसंख्या आता 1400 ते 1500 पर्यंत पोहोचली आहे. पहिल्या लाटेत उपचार घेत असलेले रूग्ण 1 हजारांच्या आसपास होेते सद्यस्थितीत ही संख्या 4 हजारांवर पोहोचली आहे. कोविडचा वाढतो धोका पाहता कोविड सेंटर्स, डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय कर्मचारी, ऑक्सीजन, व्हेंटिलेटरसह सर्व बेडची संख्या लवकरात लवकर वाढवावी. नवी मुंबईतील सर्व कोविड रूग्णांना उपचार मिळायला हवेत. तसेच कोरोना प्रतिबंधात्मक लसही मिळायला हवी. त्यासाठी राज्य सरकारकडे अधिक लसींची मागणी करावी. ठाणे, कल्याण डोंबिवली या शहरांच्या तुलनेत लोकसंख्येच्या प्रमाणात नवी मुंबईला लसीचा पुरवठा कमी मिळतो. कारण नवी मुंबईत आपली सत्ता नाही असे राज्यातील सत्ताधार्यांना वाटते. मात्र हा दुजाभाव योग्य नसल्याचे नाईक म्हणाले. कोरोनाच्या सद्यस्थितील लोकांचे जीव वाचविणे महत्वाचे असून त्यापुढे कोणतेच काम मोठे असू शकत नाही. काही मंडळी अनावश्यक कामे सुचवून पालिकेकडे उपलब्ध निधी खर्च करू पाहत आहेत. अशा कामांना फाटा देवून सर्वप्रथम आरोग्य सुविधा सक्षम कराव्यात. नविन रूग्णालये, नागरी आरोग्य केंद्रे सुरू करावीत. आरोग्य सुविधांनंतर मुलांचे भवितव्य घडविणारे शिक्षणावर आणि त्यानंतर पावसाळा जवळ आल्याने नागरिकांना काही त्रास होवू नये यासाठी पावसाळापूर्व कामांवर निधी खर्च करण्याचा सल्ला आ. नाईक यांनी दिला.
कोरोना प्रतिबंधात्मक बैठकीत आमदार गणेश नाईक यांनी केलेल्या सुचनांवर पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. पालिकेच्या वतीने सुरू उपाययोजनांची माहिती दिली. वैद्यकीय मनुष्यबळ वाढविण्यासाठी पालिकेने कर्मचारी भरती सुरू केली असून 250 कर्मचारी भरती करण्यात आले आहेत. ऑक्सिजन व व्हेंटीलेटर बेडची संख्या 450 वरून 550 वर नेण्यात येणार आहे. उपचारासाठी बेडची अचूक माहिती उपलब्ध होण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. दरदिवषी दहा हजार लसीकरणाचे ध्येय डोळयासमोर ठेवण्यात आले आहे. 15 एप्रिलपासून कोव्हॅक्सिनचे लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. बेडच्या उपलब्धतेबाबत खाजगी रूग्णालय प्रशासनाला त्यांच्या रूग्णालयाबाहेर तसा माहिती फलक लावण्याची सुचना करण्यात येणार आहे. प्रभागांमध्ये औषध फवारणी सुरू करण्यात येईल. कोविड रूग्णालयांमधून ताजे अन्न, दुध, गरम पाणी, औषधे पुरविण्यात येतील. वायफाय सुविधा सुरू करण्यात येईल. गर्दी होवू नये यासाठी एपीएमसी भाजीपाला मार्केट चोवीस तास खुले ठेवण्यात येणार आहे.
आ. नाईक यांनी केलेल्या अन्य महत्वाच्या सूचना
- संसर्गाच्या मुळाचा शोध घ्यावा
- सर्व प्रभागांत औषध फवारणी सुरू करावी
- महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ गरजूंना द्यावा
- बेडच्या उपलब्धतेची अचूक महिती रूग्णांना मिळावी
- एपीएमसीत कोरोना लसीकरण केंद्र सुरू करावे
- पालिका व खाजगी रूग्णालयांचे फायर ऑडीट करावे
- आयुक्त बांगर यांचा सकारात्मक प्रतिसाद
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai