Breaking News
नवी मुंबई : राज्यात सर्वच बाजारपेठांत टोमॅटोची आवक वाढल्याने दर घसरले आहेत. शुक्रवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक वाढल्याने टोमॅटोचे दर प्रतिकिलो 10 ते 12 रुपयांवरून 5 ते 6 रुपयांवर खाली आले आहेत.
रोजच्या स्वयंपाकात गरजेचा असणारा टोमॅटो बाजारात एरव्ही 20-30 रुपये किलोने मिळतो. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत पुणे, सातारा, सोलापूर, बारामती, सांगली या जिल्ह्यांतून टोमॅटोची आवक होत आहे. बाजारात 40 गाडी टोमॅटो दाखल होत आहेत. यातून शुक्रवारी बाजारात 2484 क्विंटल आवक झाली होती. त्यामुळे आधी प्रतिकिलो 10 ते 12 रुपयांनी विकले जाणारे टोमॅटोचे दर 5 ते 6 रुपयांवर आले आहेत. मागील वर्षी याच महिन्यात टोमॅटो प्रतिकिलो 20 रुपयांवर होते. म्हणून राज्यात लागवड जास्त झाली असून तो शेतमाल आता बाजारात दाखल होत असल्याने आवक वाढली आहे, अशी माहिती व्यापार्यांनी दिली. आवक वाढली आहे मात्र नेहमीपेक्षा टोमॅटोला मागणी कमी आहे. हॉटेल सुरू आहेत, मात्र ग्राहक नाहीत. लग्न, सांस्कृतिक कार्यक्रमावर बंदी आहे, त्यामुळे कॅटर्सकडून मागणी नाही. फेरीवाले यांच्याकडूनही कमी मागणी आहे. त्यामुळे दर उतरले आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai