Breaking News
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन
देशातील सर्वात मोठ्या अशा बहुप्रतिक्षित असणाऱ्या अटल सेतूचे अर्थात शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 12 जानेवारीला उद्घाटन झाले. या सागरी सेतूने विकासाचे बिंब म्हणून ओळखली जाणारी दक्षिण मुंबई आणि त्याचे प्रतिबिंब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईच्या दक्षिण भागाला जोडले आहे. दक्षिण मुंबईतून अवघ्या 20 मिनिटांतच दक्षिण नवी मुंबईत पोहचणे शक्य होणार आहे. त्यामुळे मुंबईसह नवी मुंबई, उरण, पनवेल, रायगड पसिसराच्या विकासाला अधिक गती मिळणार आहे.
आजचा दिवस विकसित भारताच्या संकल्पाचा ऐतिहासिक पुरावा आहे. भारताच्या विकासासाठी आपण समुद्रालाही टक्कर देऊ शकतो. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान
महाराष्ट्र हे पायाभूत आघाडीचे राज्य आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या विकासाचा हा प्रवास निरंतर सुरूच राहील. - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
अटल सेतूचे भूमिपूजनही मोदींनी केलं होतं. या देशात मोदीराज आला म्हणून अटल सेतू पूर्ण होऊ शकला. मोदीराज आला नसता तर अटल सेतू होऊच शकला नाही. - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे