Breaking News
नवी मुंबई: नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून वाशी गाव येथील कोळी बांधवांकरिता उभारण्यात आलेल्या जेट्टी, जोड रस्ता, सभामंडप व कॉक्रीट रँपचे उद्घाटन समारंभ बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. यावेळी मरीआई मच्छीमार संस्थेचे चेअरमन हरीशचंद्र सुतार, चेरेदेव मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष दिलीप पाटील, श्यामकांत सुतार व मोठ्या संख्येने कोळी बांधव-भगिनी उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाप्रसंगी आ. म्हात्रे म्हणाल्या की, आम्हा कोळी बांधव भगिनींचा नारळी पौर्णिमा हा सर्वात मोठा सण असतो. आज कोळी बांधव पारंपारिक पद्धतीने आपआपल्या होड्या सजवून समुद्राची पूजा करून समुद्राला नारळ अर्पण करतात व होड्या घेऊन मच्छीमारी करण्याकरिता समुद्रात जातात. तसेच मी आमदार पदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा वाशी गावातील कामांचा पाहणी दौरा करून तेथील स्थानिक मच्छीमारांच्या समस्या जाणून घेतल्या त्यावेळी मी मच्छीमारांना आश्वासन दिले होते की मच्छिमार बांधवांना बोटी लावण्याकरिता व मासळीची चढ-उतार करणे सुरक्षित व सुलभ व्हावे याकरिता एक जेट्टी, जोड रस्ता, जाळी विणण्याकरिता शेड, दशक्रिया विधीकरिता सभामंडप, मासळी सुकविण्याकरिता चौथरा बांधण्यात येईल व त्याचीच आज नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून पूर्तता केल्याबद्दल मला आनंद होत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai