Breaking News
मुंबई : महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर राजीनामा दिला आहे. मुंबई हायकोर्टाने कथित 100 कोटी खंडणीप्रकरणाची चौकशी सीबीआय कडे दिली आहे. त्यानंतर अनिल देशमुख यांनी शरद पवारांना भेटून, त्यांनी राजीनामा दिला. यानंतर अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांचीही भेट घेऊन राजीनामा सोपवला. अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर ते मुंबई विमानतळाकडे रवाना झाले. देशमुख हे नागपूरला जाण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. कोर्टाच्या आदेशानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला अनिल देशमुखही उपस्थित होते. देशमुखांनी पवारांकडे राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर पवारांनी होकार दिला. अनिल देशामुखांवरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. या घडामोडीनंतर आता अनिल देशमुख राजीनामा दिला आहे.
ट्वीट करत अनिल देशमुख यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलं की, उच्च न्यायालयाकडे अॅड. जयश्री पाटील यांच्याद्वारे दाखल याचिकेमध्ये आज पारित केलेल्या आदेशान्वये त्यांच्या तक्रार अर्जावर सीबीआय मार्फत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश पारित केले आहेत. त्यामुळे मी गृहमंत्री पदावर राहणे मला नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही. म्हणून मी स्वत:हून पदापासून दूर होत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai