अण्णाभाऊ साठे मैदान समस्यांच्या गर्तेत
- by मोना माळी-सणस
- Dec 17, 2022
- 674
कूठे प्लास्टिक कचरा, बाटल्या, खडी तर कूठे लोखंडी पोलांची रीघ
नवी मुंबई ः तुर्भे स्टोअर परिसरातील अण्णाभाऊ साठे मैदानाची दुरावस्था झाली आहे. मैदानात लोखंडी पोल टाकले असून कचर्याचे साम्राज्य पसरले आहे. गेट देखील तुटलेला आहे. परिणामी अपघात घडण्याची शक्यता आहे तसेच मुलांना खेळण्यास अडथळे निर्माण होत आहेत. पालिकेच्या दुर्लक्षामुळे गेल्या वर्षभरापासून या मैदानाला अवकळा आली आहे. त्यामुळे या मैदानाच्या डागडुजी व सुशोभिकरण करण्याची मागणी खेळाडू व नागरीकांनी केली आहे.
स्वच्छ नवी मुंबईत मैदानांची कमी असून असलेल्या मैदानांना बकालपणा आला आहे. त्यातीलच तुर्भे परिसरातील अण्णाभाऊ साठे मैदानाची दुरावस्था झाली असून तेथे सोयी सुविधांचा अभाव आहे. परिसरातील खेळांडुसाठी हे एकमेव मैदान असून क्रिकेटप्रेमींना याच मैदानाचा आधार आहे. परंतु मैदानाची अवस्था बिकट असल्याने खेळाडुंचा हिरमोड होत आहे. खेळाच्या मैदानात बांधकाम व लोखंडी पोल, इतर साहित्य टाकल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मैदानाला अस्वच्छतेचे ग्रहण लागले आहे. प्लास्टिक कचरा, बाटल्या, खडी, पालापाचोळा इतरत्र पसरले आहेत. परिसरातील मुले याठिकाणी खेळण्यासाठी येतात. नागरिक फेरफटका मारण्यासाठी येत असतात. मात्र त्यांना बसण्यासाठी बाक अस्तित्वात नाहीत. पिण्याच्या पाण्याची सोय नाही. दिवे नाहीत, चालण्यासाठी पदपथ उपलब्ध नाहीत. परिणामी मैदानाला बकालस्वरुप प्राप्त झाल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
- सुशोभिकरण करण्याची मनसेची मागणी
परिसरात खेळाचे हे एकमेव प्रशस्त मैदान असून त्याचीही अवस्था वाईट झाल्याने या मैदानाचे सुशोभिकरण करण्याची मागणी मनसेने केली आहे. या मैदान परिसरातील विद्युत दिवे, बसण्यासाठी बाकडे, फेर फटका मारण्यासाठी येणार्या नागरिकांसाठी पदपथ, तसेच पिण्याच्या पाण्याची सोय करावी, खेळपट्टी सोडून इतरत्र गवताची हिरवळ करावी, व्यायामासाठी साहित्य बसवावेत, मैदानाच्या नावाची कमान गेटवर लावावी, मॉर्निगवॉकसाठी पेव्हरब्लॉकचे पदपथ निर्माण करावे अशी मागणी मनसेचे तुर्भे विभाग अध्यक्ष चंद्रकांत मंजुळकर यांनी ऑगस्टमध्ये शहर अभियंता विभागाला निवेदनाद्वारे केली होती. मात्र आठ महिन्यानंतरही पालिकेने कोणतेच पाऊन न उचलल्याने मैदान जैसे थे परिस्थितीच आहे. पालिकेने केलेल्या दुर्लक्षामुळे डिसेंबरमध्ये मंजुरळकर यांनी पुन्हा स्मरणपत्र पाठवून सुभोभिकरणाची विनंती केली आहे. सुविधा उपलब्ध न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. - उद्यानाची दुरावस्था
1.उद्यानांचे शहर म्हणून नावलौकिक नवी मुंबई शहराचा आहे, पण पालिकेच्या दुर्लक्षामुळे या उद्यानांची दुरवस्था झाली आहे. घणसोली सेक्टर- 5 मधील कै. श्री. शिवाजीराव 2. अण्णासाहेब पाटील उद्यानात हीच अवस्था असून पिण्याचे पाणी नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. उद्यानात दररोज सायंकाळी लहान मुले खेळण्यासाठी, वृद्ध व्यक्ती फिरण्यासाठी येतात.
3. सायंकाळी या उद्यानात लोकांची ये-जा वाढलेली असते. मात्र, उद्यानातील दिवे बंद आहेत. पाण्याच्या टाकीत पाणी आहे; मात्र टाकीला नळ नसल्याने गैरसोय होते.
उद्यानात ठिकठिकाणी कचरा साचलेला असल्याने आक्रमक झालेल्या मनसेने घणसोली विभाग अधिकार्यांकडे पत्रव्यवहार केला आहे. तसेच सात दिवसांत उद्यानातील समस्या सोडवल्या गेल्या नाहीतर आंदोलन छेडण्यात येईल असे मनसेचे विभाग अध्यक्ष, नितीन काटेकर, यांनी सांगितले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस