Breaking News
राज्याच्या महिला व बालविकास विभागाचा प्रकल्प
नवी मुंबई ः रस्त्यावर राहणार्या मुलांची काळजी व संरक्षणासाठी तसेच त्यांना शिक्षणाच्या व समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी फिरते पथक हा एकात्मिक बाल संरक्षण योजनेअंतर्गत नाविन्यपुर्ण उपक्रम राज्याच्या महिला व बालविकास विभागाने घेतला आहे. सुरुवातील मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, नाशिक, पुणे आणि नागपुर या सहा जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
हा प्रकल्प एकात्मिक बाल संरक्षण योजनेंतर्गत केंद्र सरकारला सादर करण्यात आला होता. या प्रकल्पाला केंद्र सरकारची मान्यता मिळाली असून 50 लाख रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. तसेच या व्यतिरिक्त लागणारा खर्च बाल निधीतून करण्याचा विचार शासन स्तरावर सुरू आहे. प्रत्येक मुलाला त्याच्या वयोगटाप्रमाणे आहार व इतर शैक्षणिक मदत मिळवून देण्यासाठी हे पथक काम करेल. या बालकांना नियमित अंगणवाडीत किंवा शाळेत पाठविण्यासाठी त्यांच्या पालकांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे. हे फिरते पथक सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळात शहरातील गर्दीच्या ठिकाणी, रस्त्यावरील मुलांची संख्या जास्त असेल अशा ठिकाणी फिरेल.
मार्गदर्शक सूचना
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस