Breaking News
मुंबई ः मानहानी प्रकरणात काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांना कोर्टाने गुरुवारी सकाळी दोषी ठरवले. मोदी आडनावाचे सर्वजण चोर कसे असतात? कर्नाटकच्या कोलारमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलं आणि त्यावरून आता दोषी ठरवत सुरत न्यायालयाने त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे.
सर्व चोरांना मोदी हे समान आडनाव कसे आले? अशी टीका गांधी यांनी केली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील कोलार येथे रॅली दरम्यान राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलं होतं. त्यानंतर गुजरातचे त्यावेळचे मंत्री पुर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात बदनामीची याचिका दाखल केली होती. भारतीय दंड संहिता कलम 499 आणि 500 अंतर्गत राहुल गांधींना दोषी ठरवणाऱ्या मुख्य न्यायदंडाधिकारी एचएच वर्मा यांच्या न्यायालयानेही त्यांना जामीन मंजूर केला आणि उच्च न्यायालयात अपील करण्याची मुभा देण्यासाठी 30 दिवसांची शिक्षा स्थगित केली. मानहानी खटला प्रकरणी मुख्य न्यायदंडाधिकारी एचएच वर्मा यांच्या न्यायालयाने गेल्या आठवड्यात दोन्ही बाजूंच्या अंतिम युक्तिवादाची सुनावणी पूर्ण केली आणि चार वर्षे जुन्या मानहानीच्या खटल्याचा निकाल देण्यासाठी 23 मार्चची तारीख निश्चित केली होती, असे गांधी यांचे वकील किरीट पानवाला यांनी सांगितले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai