पुरग्रस्तांच्या नुकसान भरपाईत वाढ
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 25, 2023
- 545
प्रतिकुटुंब 10 हजार रुपये मिळणार ; अजित पवार यांची विधीमंडळात घोषणा
मुंबई ः पुराचं पाणी घरात शिरल्याने झालेल्या नुकसानीपोटी दिली जाणारी 5 हजार रुपयांची तातडीची मदत वाढवून ती प्रतिकुटुंब 10 हजार रुपये केल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात केली.
राज्यभरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर आला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. एकीकडे अतिवृष्टी होत असताना अजूनही काही जिल्ह्यांत पाऊस झालेला नाही. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका विदर्भाला बसला असून त्याचे पडसाद विधिमंडळात उमटले. विधानसभेत कामकाजाला सुरुवात होताच भाजपचे संजय कुटे यांनी ही बाब सभागृहाच्या निदर्शनास आणताना, पूरबाधितांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी केली. तर विरोधकांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून या विषयावर तातडीने चर्चा करण्याची मागणी करताना बाधितांना त्वरित मदत करण्याची मागणी केली. त्यावर सरकार शेतकरी आणि राज्यातील जनतेच्या पाठीशी असल्याचे सांगत पवार यांनी मदतीची घोषणा केली.
गेल्यावर्षीच्या नुकसान भरपाईकरता 8 हजार 677 कोटी, तर यंदा 513 कोटींचा निधी वितरीत करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. धोकादायक परिस्थिती असलेल्या भागातल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवावं, तसंच पुरस्थितीमूळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत तातडीनं द्यावी, अशा सूचना दिल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून अतिवृष्टी आणि पुरस्थितीचा आढावा घेण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले. शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू करावेत. बाधित व्यक्तींना स्वस्त धान्य दुकानातून धान्याचे वाटप तातडीने, त्याच दिवशी होईल याकरिता प्रशासनाने स्वस्त धान्य दुकानांना पुरेसा धान्याचा पुरवठा करावा.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai