खड्डांवरुन न्यायालयाने 6 पालिकांना सुनावले खडे बोल
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 11, 2023
- 395
मुंबई : मुंबईसह मुंबई महानगर क्षेत्रात वारंवार तक्रारी करून खड्डे बुजवण्याचे नियोजन करून सुद्धा रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या जैसे थे आहे. त्यामुळेच मुंबई उच्च न्यायालयाने रस्त्यावरील खड्डे आणि उघडे मॅनहोल संदर्भात राज्य सरकारसह एमएमआर क्षेत्रातील सहा महापालिकांना खडे बोल सुनावले आहेत.
राज्यातील खड्ड्यांसंदर्भात 2018 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला महत्त्वाचे निर्देश दिले. मात्र निर्देशानंतरसुद्धा राज्य सरकार महापालिका आणि इतर प्राधिकरणाने यावर कुठलीही पावलं उचलली नाहीत आणि त्यामुळे सप्टेंबर 2022 मध्ये या संदर्भात अवमान याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर डिसेंबरमध्ये पुन्हा कोर्टाने खड्ड्यांसंदर्भात निर्देश दिले. मात्र तरीही प्रशासन गंभीर नसल्याचे निदर्शनास येताच एमएमआर क्षेत्रातील सर्व आयुक्तांना समज देऊन ही सुनावणी पार पडली.
मुंबई महानगर क्षेत्रातल्या सहा महापालिकांचे सहा आयुक्त शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात दरवर्षी रस्त्यावर पडणाऱ्या खड्यांच्या समस्येवर उत्तर द्यायला आले होते. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे त्रस्त असल्याने मुंबई उच्च न्यायालयाने थेट महापालिकांना तुम्ही इतके दिवस काय केलं हे सांगा असे विचारत प्रश्नांची सरबत्ती केली. या सहा महापालिकांना मुंबई उच्च न्यायालयाने चांगलंच धारेवर धरले. त्यामध्ये मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर ,वसई विरार, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई या सर्व महापालिकांचा समावेश आहे. प्रतिवादी असलेल्या इतर 5 महापालिकांना रस्त्याची काय नेमकी काम केली या सविस्तर कामाचा अहवाल 29 सप्टेंबर च्या पुढील सुनावणी दरम्यान सादर करायचा आहे. शिवाय मुंबईसह मुख्यमंत्र्यांचं शहर असलेल्या ठाण्यामध्ये पडलेल्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याबाबत ठाणे महापालिकेला न्यायालयाने चांगलंच झापलं. ठाण्यात रस्त्यावर पडलेले खड्डे हे आमच्या भागात येत नाही, अशी भूमिका योग्य नसल्याचं न्यायालयाने ठाणे महापालिकेला सांगत सुनावले.
2018 साली दिलेले निर्देश
- चांगले रस्ते मिळणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे, तो पूर्ण करणं ही राज्य सरकार आणि पालिकेची जबाबदारी आहे.
- पालिकेनं वेबसाईटवर खड्ड्यांच्या तक्रारीसाठी स्वतंत्र पर्याय तयार करावा.
- नागरिकांना तक्रारीसाठी एक स्वतंत्र टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून द्यावा.
- वॉर्डनुसार खड्ड्यांच्या तक्रार निवारणासाठी एक अधिकारी नेमावा.
- वॉर्डमधील खड्ड्यांना जबाबदार त्या ठिकाणचे संबंधित अधिकारी असतील.
- मात्र निर्देश दिलेले असतानासुद्धा दरवर्षी रस्त्यावरील खड्ड्यांची परिस्थिती जैसे थे अशीच आहे.
कोर्टाने या महापालिकांना कुठले प्रश्न विचारले?
- गेली अनेक वर्ष या समस्या तशाच आहेत. दररोज खड्ड्यांमुळे अपघात होत आहेत, लोकांचे जीव जात आहेत. नागरिकांच्या मूलभूत समस्यांसाठी काय केलंत?
- संबंधित जबाबदार व्यक्तींवर तुम्ही काय कारवाई केली?
- ठराविक काळानंतर केबलसाठी रस्ते वारंवार खोदले जातात, फोन-इंटरनेट या सेवा देणाऱ्यांना वारंवार रस्त्या खोदल्याबद्दल कधी जबाबदार धरता का? त्यांवर कारवाई का करत नाही?
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai