Breaking News
बेटावर बोटीने पाणीपुरवठ्याची मागणी
उरण : युनोस्कोच्या जागतिक पर्यटनस्थळांपैकी एक असलेल्या घारापुरी बेटावर पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाने डिसेंबरमध्येच तळ गाठला आहे. त्यामुळे बेटावर पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. याचा फटका येथील तिन्ही गावातील नागरिकांसह, देशी परदेशी पर्यटकांनाही बसणार आहे. यावर उपाययोजना म्हणून बोटीने पाणीपुरवठा करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी घारापुरी ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडे केली आहे.
यावर्षी अपुऱ्या व कमी पावसामुळे घारापुरी बेटावरील तीन गावे, व्यावसायिक आणि बेटावर येणाऱ्या देशी-विदेशी हजारो पर्यटकांना मे महिन्यापर्यंत पाणीपुरवठा करण्यासाठी बेटावर धरण आहे. या धरणाची पाणी पातळी डिसेंबर महिन्यातच खालावली आहे. परिणामी जगप्रसिद्ध घारापुरी बेटावर डिसेंबरपासूनच पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. घारापुरीमधील काळ्या पाषाणातील कोरीव लेण्या पाहण्यासाठी मुंबईतून दररोज हजारो तर वर्षभरात देशी-विदेशी लाखो पर्यटक येतात. पर्यटक आधारित बेटावर स्थानिकांचे कॅन्टीन, रेस्टॉरंट आदी लघुउद्याोग आहेत. या सर्वांना पाणीपुरवठा करणारे जुने एकमेव धरण आहे. धरणात साठलेले पाणी बेटावरील तीन गावे, व्यावसायिक आणि दररोज बेटावर येणाऱ्या देशी-विदेशी हजारो पर्यटकांना ग्रामपंचायतीमार्फत पुरविले जाते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai