Breaking News
मुंबई ः मुंबईकर चाकरमान्यांसाठी शिमगोत्सव हा मानाचा उत्सव मानला जातो. या होळी सणासाठी 26 मार्चपासून दररोज 40 बस मुंबईतून रत्नागिरी जिल्ह्यात सोडण्यात येणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ डेपोमधून चाकरमान्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र गेल्याच आठवड्यात रत्नागिरीच्या जिल्हाधिकार्यांनी गावात येणार्यांना कोरोना रिपोर्ट बंधनकारक असेल असे आदेश काढले आहेत. त्यामुळे चाकरमान्यांना गावी जायचं असेल तर हा रिपोर्ट बंधनकारक आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातून चाकरमान्यांसाठी दररोज 40 एसटी गाड्या होळीनिमित्त धावणार आहेत. या गाड्यांमधून कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यात येणार आहे, अशी माहिती रत्नागिरी विभाग नियंत्रकांकडून देण्यात आली. चाकरमान्यांसाठी परतीच्या प्रवासासाठीही या गाड्या उपलब्ध असणार आहेत. पालकमंत्री तथा परिवहनमंत्री अनिल परब यांनी चाकरमान्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी नियोजन केलं आहे. पण कोरोनाच्या संकटामुळे चाकरमान्यांनी कोकणात येण्याबाबत साशंक आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai