शिमगोत्सवासाठी कोकणात दररोज 40 गाड्या सोडणार
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 20, 2021
- 971
मुंबई ः मुंबईकर चाकरमान्यांसाठी शिमगोत्सव हा मानाचा उत्सव मानला जातो. या होळी सणासाठी 26 मार्चपासून दररोज 40 बस मुंबईतून रत्नागिरी जिल्ह्यात सोडण्यात येणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ डेपोमधून चाकरमान्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र गेल्याच आठवड्यात रत्नागिरीच्या जिल्हाधिकार्यांनी गावात येणार्यांना कोरोना रिपोर्ट बंधनकारक असेल असे आदेश काढले आहेत. त्यामुळे चाकरमान्यांना गावी जायचं असेल तर हा रिपोर्ट बंधनकारक आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातून चाकरमान्यांसाठी दररोज 40 एसटी गाड्या होळीनिमित्त धावणार आहेत. या गाड्यांमधून कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यात येणार आहे, अशी माहिती रत्नागिरी विभाग नियंत्रकांकडून देण्यात आली. चाकरमान्यांसाठी परतीच्या प्रवासासाठीही या गाड्या उपलब्ध असणार आहेत. पालकमंत्री तथा परिवहनमंत्री अनिल परब यांनी चाकरमान्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी नियोजन केलं आहे. पण कोरोनाच्या संकटामुळे चाकरमान्यांनी कोकणात येण्याबाबत साशंक आहेत.
गावात येण्यासाठी कोरोना रिपोर्ट बंधनकारक
कोरोना विषाणूच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर आता रत्नागिरीत प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. गावात येण्यासाठी कोरोना रिपोर्ट बंधनकारक करण्यात आला आहे. त्यामुळे शिमग्याच्या सणासाठी कोकणात जायला निघालेल्या चाकरमन्यांच्या उत्साहावर पाणी फेरले जाणार आहे. त्यासाठी प्रशासनाकडून जिल्ह्याच्या सीमेवर तपासणी नाके उभारण्यात येणार आहेत. कोकणात जाणार्या नागरिकांची कोरोना टेस्ट करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ होईल, अशी माहिती रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली. यंदाही होळीच्या काळात कोकणात अशीच गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाकडून आतापासूनच योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. मात्र, प्रशासनाने येत्या दोन-तीन दिवसांची डेडलाईन देण्यासाठी आता उर्वरित दिवसांमध्ये कोकणाकडे जाणार्यांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai