कायदेशीर भूसंपादनानंतरच रस्त्याचे काम करा
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 09, 2021
- 442
उच्च न्यायालयाचे पनवेल पालिकेला आदेश
पनवेल : रोहिंजण गावाजवळील 24 मीटर रुंदीच्या रस्त्याचे काम जमीन भूसंपादनाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने पनवेल पालिका, रायगड जिल्हाधिकारी, पनवेलचे प्रांत अधिकारी यांना दिले आहेत.
या रस्ते कामासाठी पनवेल महापालिकेने नुकतीच निविदा प्रक्रिया राबवून त्याचे कंत्राट ‘ठाकूर इन्फ्रा’ कंपनीला दिले होते. मात्र या रस्त्यात रोहिंजण गावामधील ज्या शेतकर्यांच्या जमिनी जात आहेत, त्यांना भूसंपादनाचा मोबदला न देताच ही प्रक्रिया राबविण्यात आल्याने शेतकरी उच्च न्यायालयात गेले होते. यावर न्यायमूर्ती प्रसन्ना वारले, एन. आर. बोरकर या खंडपीठाने ही याचिका निकाली काढली. रोहिंजण गावातील शेतकरी भिवा म्हात्रे यांनी गेली अनेक वर्षे त्यांची शेतजमीन राखली आहे. मात्र त्यांची जमीन या रस्ते कामात जात आहे. त्यामुळे त्यांनी शासनाला जमीन हवी असेल तर कायदेशीर मार्गाने भूसंपादन करण्याची मागणी केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने म्हात्रे यांनी पनवेल पालिकेला पहिली कायदेशीर नोटीस पाठविली. त्याचे उत्तर न आल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने पालिका व जिल्हाधिकारी प्रशासनाला 2013 च्या भूसंपादनाच्या कायद्यानुसार रीतसर व कायदेशीर मार्गाने जमीन अधिग्रहित करण्याचे निर्देश दिले.
पनवेल पालिकेने त्यांचे मत मांडल्यानंतरच न्यायालयाने याचिका निकाली काढली आहे. भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून यासाठी रायगड जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात 10 जून व 29 जूनला अधिग्रहणाचा प्रस्ताव पाठविला आहे. सर्व कायदेशीर प्रक्रिया राबवूनच संबंधित रस्ता बांधण्यात येईल. भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असलेला रस्ता वगळता इतर काम करण्यात येईल. -गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल पालिका
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai