आली माझ्या घरी ही दिवाळी..
- by मोना माळी-सणस
- Oct 30, 2021
- 964
नक्षत्रांचा साज लेऊनीरात्र अंगणी आलीदीप उजळले नयनी माझ्या ही तर दीपावली...
रोषणाई, फराळ, फटाके, कंदील, दिव्यांची आरास, मिठाई, रांगोळी, उटण्याचा सुंगध, देवदेवतांची पुजा, गिफ्ट्स, नवीन कपडे, नवीन वस्तू,बोनस यांचे समीकरण आणि सर्व धर्मीय लोकांचा आनंदोत्सोव, दिपोत्सव म्हणजे दिपावली.
दिव्यांचा झगमगाट, गोडधोडाचा फराळ आणि रोषणाई यामुळे रोजच्या धावपळीतून थोडीशी उसंत घेऊन आप्तजणांसोबत एकत्र येण्याचा सण म्हणजे दिवाळी. कितीही टेन्शन, मरगळ असली तरी या पाच दिवसात ती आपोआप झटकून वातावरणात नवा उत्साह, नव चैतन्य आपसूकच निर्माण होते आणि मन आनंदीत होण्यास हातभार लागतो. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही कोरोनाची धास्ती आहेच. पण त्याचे प्रमाण थोडे कमी झाल्याने यंदा निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. त्यामुळे यंदाची दिवाळी हटके करु यासाठी अनेकांनी आधीच प्लॅन करुन ठेवले आहेत. दिवाळी हटके करा मात्र कोरोनामुळे ज्यांनी आपल्या आप्तजणांना गमावले आहे, जे रुग्णालयात उपचार घेत आहेत, ज्यांनी आपला रोजगार गमावला आहे त्यांचाही विचार व्हायला हवा. आपल्या अतिउत्साहामुळे त्यांच्या भावना दुखवल्या जाणार नाही याची काळजी घेऊन जर दिवाळी साजरी केली तर नक्कीच प्रत्येकजण दिवाळीचा आनंद घेऊ शकेल. एखादी गोष्ट मनासारखी नाही मिळाली तर रुसवे फुगवे न करता आहे त्यात समाधान मानून सण आनंदात घालवा. अशावेळी श्रीमंताच्या घरातील दिवाळी डोळ्यासमोर न आणता झोपडीत राहणार्या, पदपथावर राहणार्या गरिबाची दिवाळी आठवा. त्यांच्यापटीत तुम्ही आम्ही किती सुखी आहोत हा विचार करा आणि त्यांचीही दिवाळी आनंदीत कशी करता येईल यासाठी हातभार लावा.
तसेच कोरोनाची रुग्णसंख्या थोडी कमी झाली असली तरी हयगय करुन जमणार नाही. प्रत्येकाने स्वतःची काळजी घेऊन, कोव्हिड संबंधिचे सर्व नियम पाळून हा सण साजरा केला पाहिजे. महत्वाचे म्हणजे हाताला सॅनेटायझर लावून दिवे लावू नका किंवा कोणत्याही ज्वलनशील वस्तूला हात लावू नका. दिवाळीत कोरोनाला पुरक अशी कोणतीही कृती आपल्याकडून घडणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. दिवाळी घरच्याघरी आरोग्यदायी, सर्वांना आनंद देणारी कशी करता येईल याचे प्लान करुन दिवाळीतील उत्साह वाढवा. दिपावलीच्या शुभेच्छा.
- धनत्रयोदशी
या पाच दिवसीय महोत्सवाची सुरुवात धनत्रयोदशीपासून होते. ज्यामध्ये सर्व घरे तेलाच्या दिव्यांनी तसेच आकाश कंदील,माळा लावून सजवले जातात आणि लोक या दिवशी सोने, चांदी आणि कोणतीही नवीन वस्तू खरेदी करणे शुभ आहे असे मानतात त्यामुळे या दिवशी सोने- चांदीची खरेदी करतात. या दिवशी धन्वंतरी देवीची पूजा केली जाते, असे म्हणतात की हा दिवस आपल्या शरीराला निरोगी ठेवणारी श्रीमंत देवी धनवंतरी यांचा वाढदिवस होता. देवी देवी धन्वंतरीची उपासना करून आपल्या परिवाराच्या स्वास्थ आणि समृद्धीची कामना केली जाते.या दिवशी असे मानले जाते की या दिवशी लक्ष्मीचा घरात प्रवेश करते आणि वाईटाचा नाश होतो. सकारात्मक उर्जा घरात पसरली जाते. - नरक चतुर्दशी
हा दिवस छोटी दिवाळी म्हणूनही ओळखला जातो, नरक चतुर्दशी या पाच दिवसांच्या उत्सवाच्या दुसर्या दिवशी पडतो. या दिवशी लोक घरे स्वच्छ करतात, रंगांनी घर सजवतात. या दिवसापासून लोक एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊ लागतात. या दिवशी लोक त्यांच्या खाससाठी भेटवस्तू खरेदी करण्यास प्रारंभ करतात आणि त्यांना भेट देऊन आनंदित करतात. - लक्ष्मी पूजन
पाच दिवस चालणार्या या उत्सवातील तिसरा दिवस सर्वात महत्वाचा आहे, या दिवशी दिवाळी साजरी केली जाते. या दिवशी देवी लक्ष्मी, भगवान गणेश आणि देवी सरस्वती आणि भगवान कुबेर यांची पूजा केली जाते. असे म्हणतात की या दिवशी आई लक्ष्मी पृथ्वीवर प्रवेश करतात. आणि त्यांना त्यांच्या घरी आमंत्रित करण्यासाठी आणि कायमस्वरुपी स्थायिक राहण्यासाठी, सर्व लोक घराच्या दारावर दिवे लावतात आणि सर्व दारे, खिडक्या आणि बाल्कनी उघडे ठेवतात. सुंदर दिव्यांची सजावट व रांगोळी काढली जाते. पूजा रीतिरिवाजाने पूर्ण झाल्यावर देवतांच्या आगमनांच्या जल्लोषाला फटाके फोडून द्विगुणीत केले जाते. या दिवशी सर्व व्यापारी आपल्या दुकानात भगवान कुबेर आणि आई लक्ष्मीची पूजा करतात. - पाडवा
दिवाळीचा चौथा दिवस हा वर्ष प्रतिपदा म्हणून जाणला जातो. ह्या दिवशी राजा विक्रम सिंहासनावर आरूढ झाला होता. ह्याच दिवशी श्रीकृष्णाने इंद्र देवाच्या कोपाने झालेल्या अतिवृष्टी पासून गोकुळातल्या प्रजेचे संरक्षण करण्यासाठी गोवर्धन पर्वत उचलला होता. या दिवशी विवाहित दाम्पत्ती एकमेकांना छानसे उपहार देवून खुश करण्याचा प्रयत्न करतात. आजही बरेच लोक भगवान श्रीकृष्णांची गोवर्धन पूजा करतात. ग्रामीण भागात घरातील पशूंना विशेषतः गाई बैल आणि म्हशी व बकरी सजवून त्यांना दिवाळीचे मिष्ठान्न खायला देतात. - भाऊबीज
भाऊबीज पाच दिवस चालणार्या महोत्सवाची सांगता भाऊ-बहिणींमध्ये असीम प्रेम आणि अतूट बंधनातून होते. पाचव्या दिवशी आपल्याला भाऊबीज नावाने माहित आहे, भारतातील काही राज्यांमध्ये या दिवसाला टीका देखील म्हणतात. हा दिवस रक्षाबंधनासारखाच आहे पण याची प्रथा वेगळ्या आहेत. भाऊबीज दिवशी कुटुंबातील सर्व बहीण- भाऊ एकत्र काही वेळ घालवतात आणि काही संस्मरणीय क्षण तयार करतात. परंपरेनुसार या दिवशी बहीण आपल्या भावाची पूजा करते आणि भाऊ आपल्या बहिणीला त्याची आवडती भेटवस्तू देते. या दिवशी, भाऊ आपल्या बहिणीच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करते आणि बहिणीने देखील आपल्या भावाच्या आरोग्यासाठी शुभेच्छा देते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस