जनता दरबारात द्रोणागिरीकरांनी वाचला समस्यांचा पाढा
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 05, 2023
- 411
उरण : सिडकोच्या द्रोणागिरी नोड मधील नागरिकांच्या विविध नागरी समस्यांसाठी उरणचे आमदार महेश बालदी यांनी आयोजित केलेल्या जनता दरबारात नागरीकांनी पाणी, रस्ते, शिक्षण, गटार, आरोग्य व दळणवळण या समस्यांचा पाढा वाचला. द्रोणागिरीमध्ये रुग्णालय, पोलीस ठाणे आदी समस्या सोडविणार असल्याचे आश्वासन बालदी यांनी दिले.
यावेळी येथील द्रोणागिरी नोड मधील नागरिक विश्वनाथ पाटील यांनी सीआरझेड क्षेत्रामुळे अनेक वर्षांपासून इमारतींना ओसी मिळालेली नाही. त्याचप्रमाणे सेक्टर 51 व 52 ला जोडणारे खाडीपूल धोकादायक, वाहन चालकांना धोका असल्याचा मनोज म्हात्रे यांनी मांडली, सुरक्षा म्हणून पोलीस चौकी, सीसीटीव्ही, बसविण्यात यावे जेणेकरून चोरीचे प्रमाण कमी होईल. अनिल बेंगडे, अक्षर ईस्टोनिया सारख्या उच्चभ्रू वस्तीत पाणी समस्या गंभीर असल्याचे मत नवनाथ जगताप व रजनी रंजन यांनी मांडली. या वस्तीला टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. त्याशिवाय पाणी कमी दाबाने, सांडपाणी, आरोग्य सुविधांची कमतरता, या समस्या आहेत. यात सीआरझेड समस्या दूर करणार, सीसी, ओसी आणि मावेजा, पिण्याच्या पाणी समस्या संदर्भात सिडकोच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून नियोजन केलं जाईल, सिडकोत लढल्याशिवाय काही मिळणार नाही असे आ. बालदी म्हणाले. या दरबाराचे आयोजन विधीत पाटील यांनी केले तर यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, भाजपा नेते चंद्रकांत घरत, रवी भोईर, महेश कडू, पंडित घरत आदीजण उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai