कोरोनाची दहशत ; रत्नागिरीतील सार्वजनिक वाहतूक बंद होणार
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 19, 2020
- 882
रत्नागिरी : कोरोनाग्रस्त रूग्णांमध्ये वाढ झाली आहे. आतापर्यंत ही संख्या 47 वर पोहोचली आहे. रत्नागिरीतही कोरोनाबाधित एक रूग्ण सापडला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पत्रकार परिषद घेतली. पुढील काही दिवसांत महत्वाच्या घडामोडी रत्नागिरीत घडणार आहे. जिल्हाधिकार्यांनी पुढील 5 दिवस रत्नागिरीतील सार्वजनिक वाहतूक हळूहळू बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
दुबईवरून रत्नागिरीत आलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. चार दिवसांत ही व्यक्ती दुबईतून रत्नागिरीत पोहोचली. या व्यक्तीची तब्बेत आता ठणठणीत बरी आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे. ही व्यक्ती गुहागरमधील एका खासगी रुग्णालयात गेला होता त्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे. त्याच्यासोबत आलेल्या दोन जणांना देखील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. गुहागरमध्ये दुबईवरून आलेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. यामुळे रत्नागिरीत पुढील काही दिवसांत महत्वाचे निर्णय घेण्यात येणार आहे. कोकणात सध्या शिमग्याचा उत्सव आहे. या पण या उत्सावावर देखील आता बंदी आणण्यात आली आहे. गावोगावी देवीची पालखी येते आणि उत्साहात शिमगा साजरा केला जातो. पण आता रत्नागिरी आणि रत्नागिरी नजीकच्या अनेक गावांत पालखी आणण्यास बंदी केली आहे. एवढंच नव्हे तर रत्नागिरीतील सर्व मंगल कार्यालये, परमिट रुम, बिअर बार बंद ठेवणार असल्याची माहिती देखील जिल्हाधिकार्यांनी दिली आहे. तसेच सर्वच धार्मिक स्थळ देखील बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai