जुन्या वादाचा 25 वर्षांनी बदला
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 21, 2023
- 545
बांधकाम व्यावसायिकाच्या हत्येचा उलगडा
नवी मुंबई : नेरुळमध्ये 15 मार्चला रोजी बांधकाम व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या झाली होती. या हत्येचे गुढ उकलण्यात पोलीसांना यश आले असून चार आरोपी अटक केली आहे. या हत्येचे धागेदारे 25 वर्षांपूर्वीच्या एका हत्येशी निगडित आहेत. गावातील दोन गटांतील वादात पटेल यांची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणाचा पूर्ण उलगडा झाला असला तरी सर्व मारेकरी अद्याप अटक करण्यात आलेले नाहीत.
सावजी मंजिरी उर्फ पटेल यांच्या दोन छातीत आणि एक पोटात गोळी लागल्याने त्यांचा जागेवर मृत्यू झाला होता. घटनास्थळी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्यासह सर्वच वरिष्ठ अधिकारी आले होते. स्वतः आयुक्त भारंबे या प्रकरणात लक्ष देत पाठपुरावा करीत होते. सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपास करीत पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले, अशी माहिती पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच आरोपींना हस्तांतर कोठडीअंतर्गत लवकरच नवी मुंबईत आणले जाणार आहे, असेही भारंबे यांनी सांगितले. मेहेक नारिया, कौशल यादव, गौरव कुमार यादव, सोनुकुमार यादव असे अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत. यातील मेहेक याला गुजरातमधून, तर अन्य आरोपींना बिहार येथून अटक केली आहे. आरोपी अन्यत्र पळून जाऊ नये म्हणून वेगवान हालचाली करीत त्यांना अटक करण्यासाठी विमानाने पथक तेथे रवाना झाले होते. तेथील उच्च पदस्थ एका पोलीस अधिकाऱ्याने या कामी नवी मुंबई पोलिसांना मोलाची मदत केली. पटेल यांची हत्या झाल्यानंतर 48 तासांत पोलिसांना या प्रकरणातील सत्य समजले होते. मात्र आरोपी किती? कोण? या बाबत अद्याप चित्र स्पष्ट झालेले नाही.
गुजरात येथील सायंगाव, तालुका रापर, जिल्हा कच्छ हे पटेल यांचे मूळ गाव आहे. गावातील वाद आणि 25 वर्षांपूर्वी बचूभाई पटनी या इसमाच्या झालेल्या हत्येचा बदला म्हणून मंजिरी उर्फ पटेल यांची हत्या केल्याचे समोर आले आहे. पटनी यांची हत्या सावजी यानेच केली असल्याचे आजही गावात बोलले जात असून त्याला या प्रकरणात अटकही करण्यात आली होती. 11 महिने तुरुंगात राहिल्यावर त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. या गावात सावजी पटेल याचे वागणे अरेरावीचे असल्याने त्यांच्याविषयी चीड निर्माण झाली होती. त्यात दोन महिन्यांपूर्वी सावजी याचे नारिया यांच्या कुटुंबासोबत जमिनी आणि जुन्या वादावरून भांडण झाले होते. कदाचित सावजी आपल्याला ठार करेल, अशी भीती वाटत असल्याने त्यापूर्वीच आपण त्याला संपवावे म्हणून ही हत्या करण्यात आली. यासाठी बिहार येथील तीन आरोपींना 25 लाखांची सुपारी देण्यात आली होती.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai