उरणमध्ये दोन दिवसांची पाणी कपात सुरू
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 13, 2025
- 51
उरण ः रानसई धरणातून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) मार्फत करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यात आठवड्यातून दोन दिवसांची पाणी कपात सुरू केली आहे. दर मंगळवारी व शुक्रवारी ही कपात करण्यात येत असून नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन एमआयडीसीने केले आहे.
यावर्षी लांबलेल्या पावसामुळे नोव्हेंबरमध्ये पाणी कपातीपासून दिलासा मिळाला. मात्र रानसई धरणाच्या पाणी पातळीत घट झाल्याने डिसेंबर महिन्यात पाणी कपात जाहीर करण्यात आली. रानसई धरणाची पाणी साठवणूक क्षमता कमी असल्याने पावसाळ्यातील लाखो लीटर पाणी वाया जाते. त्यामुळे येथील नागरिकांना ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यापासूनच वर्षोनुवर्षे पाणी कपातीचा सामना करावा लागतो. धरणाची पाणी क्षमता वाढविण्यासाठी एमआयडीसीने तयार केलेला प्रस्ताव अनेकवर्षे धूळखात आहे.
उरणकरांना दररोज 41 दश लक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. मात्र एमआयडीसी कडे केवळ 30 दश लक्ष लिटर पाणीच असल्याने दररोज 10 दश लक्ष लिटर पाणी कमी पडत आहे. हा पाणी पुरवठा जून महिन्यापर्यंत करता यावा यासाठी पाणी कपात केली जाते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai