निवडणुकीत महाविकास आघाडीची बाजी
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 02, 2020
- 465
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निकालास सुरुवात
नवी मुंबई : सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे. त्यामुळे या बाजार समितीवर महाआघाडीचे वर्चस्व येणार असल्याची शक्यता आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीची बाजी मारली आहे. भाजपला या निवडणुकीत अपेक्षित यश मिळवता आलेले नाही. याआधी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे यश होते. मात्र, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविण्यात आली आणि यात त्यांना पुन्हा यश मिळाले आहे. महाविकास आघाडीचे अशोक वाळुंज, संजय पानसरे, शंकर पिंगळे, राजेंद्र पाटील हे विजयी उमेदवार झाले आहेत.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत अशोक वाळुंज यांनी विजयाची हॅ्टट्रीक केली आहे. कांदा बटाटा मार्केटमधून अशोक वाळूंज विजयी झाले आहेत. ते कांदा बटाटा मार्केट संचालकपदी सलग तिसर्यांदा निवडून आले आहेत. दाणा मार्केटमधून नीलेश विरा विजयी झाले आहेत. तसेच मसाला मार्केटमधून विजयी भूता विजयी झाली आहेत. पुणे महसूल विभागातून महाविकास आघाडीचे धनंजय वाडकर, बाळासाहेब सोळस्कर विजयी झाले आहेत. तर कोकण महसूल विभागातून महाविकास आघाडीचेे राजेंद्र पाटील आणि अपक्ष प्रभू पाटील विजयी झाले आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai