Breaking News
मुंबई : पावसाळी अधिवेशनाची सुरुवात वादळी ठरली असून पहिल्याच दिवशी सत्ताधारी-विरोधक एकमेकांना भिडल्याचे पाहायला मिळाले. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपच्या आमदारांनी जोरदार गोंधळ घालत सभागृहाचे कामकाज बंद पाडले. यावेळी धक्काबुक्की केलेल्या 12 भाजपच्या आमदारांना 1 वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहेत.
ओबीसींचं आरक्षण रद्द झाल्यानंतर इंपेरिकल डाटा केंद्र सरकारने राज्य सरकारला उपलब्ध करून द्यावा, असा ठराव ठाकरे सरकारने विधानसभेत मांडला आहे. याविरोधात विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या दालनात येऊन जोरदार घोषणाबाजी केली. तसेच अध्यक्षांचा माईकही ओढला. यावेळी सभागृहात धक्काबुक्कीचा प्रकार घडल्याचा दावा सत्ताधार्यांनी केला. या प्रकारावर सत्ताधार्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून गोंधळी 12 आमदारांवर कारवाईची मागणी केली आहे.
भाजप आणि शिवसेना आमदारांमध्ये वादावादी झाली, असा खुलासा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. विरोधकांशी चर्चा करुनच पुढील कारवाई करा, असे आवाहनही त्यांनी केली. मात्र गदारोळ करणर्या 12 आमदारांचे निलंबनाचा प्रस्ूताव अनिल परब यांनी मांडला. तो बहुमताने मंजूर करण्यात आला. या कारवाईचा निषेध करत भाजप सदस्यांनी सभागृहाचा त्याग केला. दरम्यान, अधिवेशनात विविध प्रकरणं काढू या भितीनेच आमच्या आमदारांचे निलंबन करण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
यात संजय कुटे, आशिष शेलार, हरीश पिंपळे, योगेश सागर, गिरीश महाजन, पराग आळवणी, अभिमन्यू पवार, अतुल भातखलकर, नारायण कुचे, राम सातपुते, जयकुमार रावल आणि बंटी बंगडीया या आमदारांचा समावेश आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai