Breaking News
जगातलं वाढतं वायू, ध्वनी प्रदूषण आणि कामाची वाढलेली वेळ कर्मचार्यांना मृत्यूच्या अधिक जवळ नेत असल्याचं जागतिक आरोग्य संघटना आणि आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने केलेल्या एका संयुक्त अहवालात आढळलं आहे. नोकरीदरम्यान होणारे आजार आणि कामावेळी जखमी झाल्याने मृत्यूमुखी पडण्याचं प्रमाण वाढत आहे. 2016 मध्ये यामुळे जगभरात दोन दशलक्ष लोकांचा मृत्यू झाला.
जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (आयएलओ) यांनी पहिल्यांदाच कामाच्या ठिकाणी विविध समस्यांना तोंड देणार्या कर्मचार्यांचा अभ्यास करून एक संयुक्त अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, 2000 ते 2016 दरम्यान कामावर असलेल्या कर्मचार्यांना होणारे रोग आणि जखमी होण्याच्या प्रमाणावर लक्ष ठेवण्यात आलं. अहवालात दिसून आलं की बहुतेक कर्मचार्यांचा मृत्यू श्वसन आणि हृदयरोगामुळे झाला आहे. बहुतेक मृत्यू कामाच्या दीर्घ तासांमुळे होतात. अहवालात असंही म्हटलं आहे की 7.50 लाख मृत्यू कामाच्या तासांशी संबंधित आहेत. त्याच वेळी, कामाच्या ठिकाणी वायू प्रदूषणामुळे (पीएम कण, वायू) 4.50 लाख मृत्यू झाले. 81 टक्के मृत्यूंचं कारण असंसर्गजन्य रोग हे होतं.
संसर्ग न होणारे रोग म्हणजे अशा व्याधी ज्यांचा प्रसार एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीमध्ये होत नाही. श्वसन रोग आणि हृदयरोग संसर्गजन्य नाहीत. कर्मचार्यांच्या आरोग्याचा परिणाम कामावर आणि त्यातून निर्माण होणार्या आर्थिक मुल्यांवर होत राहतो. आजारपण आणि दुखापतीमुळे कर्मचार्यांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो आणि त्यांची काम करण्याची क्षमता कमी होते. साहजिकच त्याचा थेट परिणाम त्यांच्या कमाईवरही होतो. 2000 ते 2016 दरम्यान, कामाचे तास वाढल्याने कर्मचार्यांमध्ये हृदयरोगाचे प्रमाण 41 टक्क्यांनी आणि स्ट्रोकचे प्रमाण 19 टक्क्यांनी वाढल्याचं अभ्यासात आढळलं.
डब्ल्यूएचओच्या पर्यावरण, हवामानबदल आणि आरोग्य विभागाचे संचालक डॉ. मारिया नीरा म्हणतात, जगात वीस लाख मृत्यू अकाली आहेत. ते थांबवता येतील. कर्मचार्यांचं आरोग्य आणि सुरक्षा सुनिश्चित करणं ही आरोग्य आणि कामगार क्षेत्राची जबाबदारी आहे. अहवालानुसार, दक्षिण आशिया आणि पश्चिम पॅसिफिक महासागराच्या परिसरातल्या 54 वर्षांखालील पुरुषांमध्ये सर्वाधिक मृत्यू होत आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai