राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला धरले धारेवर
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 07, 2023
- 568
नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहाव्या दिवशी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अदानी, महागाई, बेरोजगारी आणि अग्निवीर योजनेवर केंद्र सरकारला घेरलं. विशेषत: अदानींच्या मुद्द्यावर राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. रस्ता कोणी बनवला विचारलं तर अदानींचं नाव येतं, हिमाचलचं सफरचंद अदानींच्या नावावर आहे. पंतप्रधान मोदी आणि गौतम अदानी यांचे काय संबंध आहेत? हे देश जाणून घेऊ इच्छितो, असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला.
यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांचा एक जुना फोटो दाखवला, यावरून सत्ताधाऱ्यांनी संसदेत जोरदार हंगामा केला. अदानी 2014 मध्ये 609व्या स्थानावर होते. इतक्या कमी कालावधीत ते जगातील श्रीमंताच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर कसे पोहोचले, खरी जादू तेव्हा सुरु झाली जेव्हा मोदी दिल्लीत आले, असा घणाघात राहुल गांधी यांनी केला. अदानी समूह केवळ 8 ते 10 बिझनेस क्षेत्रात आहे, मग त्यांची संपत्ती 2014 मध्ये 8 अब्ज डॉलरवरुन 2022 मध्ये 144 बिलिअन डॉलरवर कशी पोहोचली, असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला. सार्वजनिक क्षेत्राचा पैसा मोदींनी अदानींना दिला... मोदी विदेशात जिथे जिथे गेले तिथला व्यवसाय त्यांनी अदानींना मिळवून दिला, असा आरोप राहुल गांधींनी केला. तर राहुल गांधी बिनबुडाचे आरोप करत असल्याचा पलटवार भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी केला.
राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या अग्नीवीर योजनेवरुनही जोरदार टीका केली. अग्नीवीर योजना ही सैन्याची नाही असं निवृत्त लष्कर अधिकारी सांगत असल्याचं राहुल गांधी यांनी सांगितलं. अग्निवीर ही योजना अजित डोव्हालांनी आर्मीवर थोपवलेली योजना असल्याची टीका राहुल गांधीनी लोकसभेतील भाषणात केली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर लोकसभेतील चर्चेदरम्यान राहुल गांधीनी जनतेच्या प्रश्नांची यादी मांडली. भारत जोडो यात्रेतील अनुभवांचं कथन करताना सरकारच्या योजना जनतेसाठी उपयोगी पडत नसल्याचं सांगितलं. राष्ट्रपतींच्या भाषणात, बेरोजगारी, महागाई हे जनतेच्या संबंधित विषयांचा उल्लेख नसल्याची टीका राहुल गांधी यांनी केली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai