Breaking News
पाऊस म्हटल्यावर सोबत येतात काळेकुट्ट ढग, मातीचा सुवास, रंगीबेरंगी छत्र्या आणि विविध आजार. पावसाळ्यात आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या डोके वर काढतात. घातक सूक्ष्मजीव रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करुन मानवी शरिरावर हल्ला करण्यास तयार असतात. बाहेरून आल्यावर शरीर कोरडे आणि निर्जंतुक केले तरीही, जंतूंपासून संपूर्ण संरक्षण मिळतेच असे नाही. म्हणूनच रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी आहारात बदल करणे आवश्यक असते.
पावसाळ्यात पर्यावरणातील आर्द्रतेमुळे आपली पचनक्रिया मंदावते. बहुतेकदा भारतीय लोक पावसाळ्यात तोंडाला पाणी आणणारे मसालेदार पदार्थ जसे की वडा, समोसा, भजी आणि चहा-कॉफी यांना प्राधान्य देतात. त्यामुळे जंतूसंसर्ग तसेच फ्लू, विषाणूजन्य ताप, टायफॉइड अशा प्रकारचे रोग होण्याची भीती असते. म्हणूनच या रोगांशी लढण्यासाठी आणि आजारी न पडता पावसाचा आनंद घेण्यासाठी, आहारात काही रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या गोष्टींचा समावेश करणे गरजेचे असते. भारतात पावसाळ्यात घेतल्या जाणाऱ्या आहारामध्ये तळलेले अन्न, चहा, कॉफी, मांस, तृणधान्ये आणि कडधान्ये यांचा समावेश होतो. ज्यात कार्बोहायड्रेटचे आणि प्रथिनांचे प्रमाण जास्त असते, परंतु सूक्ष्म पोषक घटकांची कमतरता असते. म्हणूनच पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी, कार्बोहाइड्रेट आणि प्रथिनांसह सूक्ष्म पोषक घटकांचा समावेश आहारात करणे गरजेचे ठरते. यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेले सूप हा एक उत्कृष्ट पर्याय ठरू शकतो.
संपूर्ण पावसाळ्यात निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी वर सूपचे काही मोजके पर्याय दिले आहेत. तुम्ही आवडीनुसार वेगवेगळ्या भाज्या आणि कडधान्ये वापरून, तुम्हाला हवे असलेले सूप तयार करू शकता. परंतु फक्त एकच भाजी असलेल्या साध्या सूपपेक्षा, वेगवेगळ्या भाज्या टाकून चविष्ट सूप बनवण्याकडे लक्ष द्या. याव्यतिरिक्त पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी चांगले खा, बाहेरचे तळलेले अन्न टाळा, हायड्रेटेड राहा, आणि तुमच्या आहारातून जास्तीत जास्त पोषक आणि सूक्ष्मघटक मिळतील याची खात्री करा.
- आहारतज्ञ दिनराज मोहिनी आपोणकर (लेखक आहारतज्ञ असून मातापोषण आणि बालकांची वाढ या विषयावर संशोधन करत आहेत.)
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai