कांद्याच्या किमंती राहणार नियंत्रणात
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 17, 2020
- 1034
सरकारने बनवला फॉर्मुला
नवी दिल्ली : कांद्याचे दर वाढल्यानंतर सर्वसामान्य व्यक्ती, शेतकरी आणि सरकारच्या अडचणी वाढल्या होत्या. भविष्यात अशी स्थिती निर्माण होऊ नये म्हणून सरकारने यासाठी आधीच उपाययोजना केल्या आहेत. देशांतर्गत कांद्याचा बफर स्टॉक वाढवण्यासाठी योजना बनवण्यात आली आहे. यामुळे कांद्याच्या वाढत्या किंमतीतही हे दर वाढणार नाहीत. केंद्र सरकार कांद्याचा बफर स्टॉक 1 लाख टनने वाढून 1.5 लाख टन करणार आहेत. यामुळे येणार्या काळात कांद्याच्या किंमतीत वाढ होताना दिसणार नाही. बफर स्टॉक वाढवला गेल्यानंतर जेव्हा मार्केटमध्ये कांद्याची कमी निर्माण होईल तेव्हा हा कांदा बाजारात उतरवला जाणार आहे.
देशाअंतर्गतच कांद्याचा इतका स्टॉक व्हावा की बाहेरच्या देशातून कांदा आणण्याची वेळ लागू नये. यावर्षी कांद्याच्या जास्त मागणीमुळे सरकारने अफगाणिस्तानमधून कांदा मागवला होता. पण देशात बफर स्टॉक राहील्यास कांदा आयात करावा लागणार नाही. या योजनेअंतर्गत रग्बी काळात तयार होणार्या कांद्याची खरेदी शेतकर्यांकडून होईल. या सिझनमध्ये खराब झालेले कांदे लवकर खराब होणार नाहीत. दरवर्षी ओलाव्यामुळे 40 हजार टन कांदा खराब होतो. पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये कांदा खरेदीला सुरुवात करेल. मार्केटमध्ये सध्या कांदा 25 रुपये प्रति किलो भावाने विकला जातोय. ही किंमत सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये 75 रुपये प्रति किलो होती. काही बाजारांमध्ये ही किंमत 100 रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचली होती. कांद्याची पूर्तता करणार्या महाराष्ट्र, कर्नाटकसारख्या राज्यांमध्ये कांदा खराब झाला.
23 ऑक्टोबरपासून रिटेल आणि होलसेलमध्ये कांदा साठवणुकीची मर्यादा लागू करण्यात आली. रिटेल व्यापार्यांसाठी साठवणुकीची मर्यादा 2 टन तर घाऊक विक्रेत्यांसाठी 25 टन इतकी आहे. सरकारने ऑक्टोबरमध्ये कांदा निर्यात थांबवली होती.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai