निर्मला सीतारमण यांनी मांडला सलग तिसरा अर्थसंकल्प
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 01, 2021
- 890
नवी दिल्ली ः आज दशकातील पहिला अर्थसंकल्प संसदेत सादर करण्यात येत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण आपला सलग तिसरा अर्थसंकल्प मांडत आहेत. या अर्थसंकल्पात आरोग्य, सार्वजनिक वाहतूक, रेल्वे, शहरांचा विस्तार यावर भरीव तरदूत करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे.
काय आहे बजेटमध्ये?
- परवडणारे घर खरेदी करण्यासाठी कर्जामध्ये 1.45 लाखापर्यंतची सवलत मिळणार
- देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच डिजिटल पद्धतीने जनगणना होणार, 3700 कोटी रूपयांची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.
- भारतीय भाषांसाठी नॅशनल लँग्वेज ट्रान्सलेशन मिशन
- जेष्ठ नागरिकांसाठी अर्थसंकल्पातील विशेष तरतूद, ज्यांचे वय 75 वर्षे अधिक आहे त्यांना इनकम टॅक्स रिटर्न्स फाईल करण्यासापासून सूट
- शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
- शेतमालाला दीडपट हमीभाव देण्याचं सरकारचं लक्ष्य तर गहू उत्पादकांना 75 हजार 60 कोटींच्या मदतीची तरतूद
- देशात नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ हेल्थची उभारणी करणार असून त्यासोबतच 9 बायोलॅब उभारणीसाठीही तरतूद करण्यात आली आहे.
- सरकारी बँकांसाठी 20 हजार कोटींची तरतूद, बीपीसीएल, एअर इंडिया, पवन हंस, आयडीबीआयची निर्गुंतवणूकीची प्रक्रिया पूर्ण करणार - अर्थमंत्री
- आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन योजनांची खैरात
- विधानसभा निवडणुका असलेल्या राज्यांसाठी मोठी घोषणा..केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि आसामाकरता योजना - अर्थमंत्री
- देशभरात 7 टेक्स्टटाईल पार्क उभारणार - अर्थमंत्री
- येत्या आर्थिक वर्षात 4.39 लाख कोटी खर्च करणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
- नाशिक मेट्रोसाठी 2 हजार 92 हजार तर नागपूर मेट्रोसाठी 5 हजार 976 कोटींची तरतूद - अर्थमंत्री
- सार्वजनिक वाहतुकीतील बसेसची सुधारणा करण्यासाठी 18 हजार कोटी - अर्थमंत्री
- कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी 1 लाख 78 हजार कोटींची निधी - अर्थमंत्री
- मुंबई- कन्याकुमारी महामार्गासाठी 64 हजार कोटींची तरतूद - अर्थमंत्री
- अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रात सोलार एनर्जी कॉर्पोरेशनला 1 हजार कोटींची तरतूद - अर्थमंत्री
- राष्ट्रीय रेल्वे योजना 2030 ची अर्थमंत्र्यांकडून घोषणा
- पायाभूत सुविधांसाठी अर्थसंकल्पात मोठी भांडवली तरतूद, 2030 पर्यंत हायटेक रेल्वेचं लक्ष्य डोळ्यासमोर, रेल्वेसाठी 1 लाख 10 हजार 55 कोटींच्या निधीची तरतूद - अर्थमंत्री
- उज्वला योजनेत 1 कोटी लोकांना सहभागी करून घेणार, 100 जिल्ह्यांमध्ये सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन योजना राबवणार
- दुसर्या आणि तिसर्या श्रेणीच्या शहरात गॅस पाईपलाईनचा विस्तार करणार - अर्थमंत्री
- 15 वर्षे जुन्या वाहनांसाठी ’स्क्रॅपिंग पॉलिसी’
- जुन्या वाहनांचा फिटनेस तपासला जाणार असून जुनी वाहने मोडीत निघणार. -अर्थमंत्री
- मिशन पोषण 2.0 ची अर्थमंत्र्यांकडून घोषणा -अर्थमंत्री
- अर्बन स्वच्छ भारत मिशन 2.0 साठी 1 लाख 41 हजार 678 कोटी 2021
- जल जीवन मिशन योजनेसाठी 2 लाख 87 हजारांची तरतूद, अनेक शहरांसाठी जलजीवन मिशन राबवणार - अर्थमंत्री
- अर्थसंकल्पात कोविड लसीकरणासाठी 35 हजार कोटींची तरतूद
- पीएम आत्मनिर्भर स्वास्थ भारत योजना, स्वास्थ भारतासाठी 64 हजार 180 कोटींची घोषणा - अर्थमंत्री
- देशात नव्या आरोग्य संस्था उभारणार तसेच आरोग्य संस्थांना बळकटी प्राप्त होण्यासाठी प्रयत्न - अर्थमंत्री
- अर्थसंकल्पात आत्मनिर्भर भारताचं व्हिजन असणार असून आत्मनिर्भर भारतात तरूणांना संधी देण्यात येणार -अर्थमंत्री
- शेतकर्यांचं उत्पन्न दुप्पट करणार असून शेती क्षेत्र मजबूत करण्यावर अधिक भर - अर्थमंत्री
- कोरोनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचा पूरवठा केला- अर्थमंत्री
- आत्मनिर्भर भारताच्या पॅकेजमध्ये सुधारणा करण्यात आली असून 100 पेक्षा अधिक देशांना कोरोनाची लस देणार -अर्थमंत्री
- 80 कोटी लोकांना मोफत धान्य पुरवलं यासह 8 कोटी लोकांना मोफत गॅस कनेक्शन देखील देण्यात आले- अर्थमंत्री
- निर्मला सीतारमण म्हणाल्या की, मोदी सरकारने आत्मनिर्भर भारत पॅकेज म्हणून कोरोना काळात अनेक योजना देशात आणल्यात जेणेकरून अर्थव्यवस्थेला गती प्राप्त होईल. आत्मनिर्भर भारत पॅकेजमध्ये एकूण 27.1 लाख कोटी रुपये जाहीर झाले. हे सर्व पाच मिनी बजेटसारखेच होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai