Breaking News
नवी मुंबई ः कोरोनाच्या पार्श्वभुमीवर नवी मुंबइ, वर्सई-विरार आणि औरंगाबाद महापालिका निवडणूक, जिल्हा परिषद आणि नगरपालिका पोटनिवडणुक स्थगित करण्याचा निर्णय राज्य निवडणुक आयोगाने घेतला आहे.
राज्यात करोना विषाणूचा (कोव्हिड- 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती राज्य शासनाने राज्य निवडणूक आयोगास केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचा 10 ऑगस्ट 2005 रोजीच्या निकालानुसार नैसर्गिक आपत्ती अथवा आकस्मिक परिस्थिती उद्भवल्यास निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगास आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने सर्व निवडणुकांशी संबंधित प्रभाग रचना, मतदार यादी व प्रत्यक्ष निवडणूक आदी स्वरूपाचे सर्व कार्यक्रम (ता.17) रोजी आहे त्या टप्प्यांवर स्थगित केले आहेत. राज्यातील 19 जिल्ह्यांतील 1 हजार 570 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी नामनिर्देशनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यासाठी 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते. त्याचबरोबर औरंगाबाद आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक; तसेच नाशिक, धुळे, परभणी व ठाणे महानगरपालिकेतील प्रत्येकी एका रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीकरिता मतदर याद्या तयार करण्याची प्रक्रिया सुरू होती. वसई- विरार महानगरपालिका, अंबरनाथ, कुळगाव- बदलापूर, वाडी, राजगुरूनगर, भडगाव, वरणगाव, केज, भोकर आणि मोवाड या नऊ नगरपरिषदा/ नगरपंचायती, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या 15पंचायत समित्या; तसेच सुमारे 12 हजार ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचनेसंदर्भात कार्यवाही सुरू होती. या सर्व कार्यक्रमांना पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. पुढील कार्यवाहीसंदर्भात परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येतील, असेही मदान यांनी स्पष्ट केले आहे.
जगभरात थैमान घातलेल्रा कोरोना व्हाररसनं भारतातही वेगाने प्रवेश केला आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्रा मुंबईत तर कोरोना एक बळी घेतला आहे. मुंबईतील कस्तुरबा गांधी रुग्णालरात 64 वर्षीर रुग्णाचा मृत्रू झाला. दुसरीकडे, कोरोना व्हाररसच्रा भीतीमुळे अनेक शासकीर कर्मचारी, विभाग धास्तावले आहेत. खासगी क्षेत्रातही जवळपास 50 टक्के कर्मचारी घरातून काम करत आहेत. रा पार्श्वभूमीवर राज्रातील सर्व शासकीर कार्रालरे देखील काही दिवस बंद ठेवण्राचा निर्णर घेण्रात रेण्राची शक्रता आहे. रा संदर्भात मंत्रिमंडळाच्रा बैठकीत मुख्रमंत्री उद्धव ठाकरे हे थोड्याच वेळात निर्णर घेण्राची शक्रता आहे. दरम्रान, शासकीर अत्रावश्रक सेवा सोडून इतर कार्रालर बंद करता रेईल का, रावर कॅबिनेट बैठकीत चर्चा होणार असल्राची माहिती सूत्रांनी दिली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai